पोलिसांसमोर २२ नक्षलवादी आले शरण


मलकानगिरी : मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशा पोलिसांसमोर २२ नक्षलवादी शरण आले. आपल्या हातातील शस्त्र टाकून माओवादी नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती स्वीकारली. शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांची माहिती देणाऱ्यांना पोलिसांनी लाखो रुपयांची बक्षीसं जाहीर केली होती. यामुळेच ही शरणागती पोलिसांच्यादृष्टीने महत्त्वाची आहे.



शरण आलेल्या नक्षलवाद्यांना नियमानुसार पुनर्वसनासाठी सरकारकडून आवश्यक ती आर्थिक मदत आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा पूर्ण सहकार्य करेल.


ओडिशा पोलिसांसमोर शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय प्रमुख, सहा एसीएम आणि १५ पार्टी सदस्य आहेत. या नक्षलवाद्यांवर साडेपाच लाख रुपयांपासून २७.५० लाख रुपयांपर्यंतची बक्षीसं होती.


ओडिशातील कालाहंडी, कंधमाल, बालनगीर, मलकानगिरी, कोरापुट, नबरंगपूर, नुआपाडा, रायगडा आणि बौध जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांचा प्रभाव आहे. यापैकी सहा जिल्हे माओवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या सीमेवर आहेत. यामध्ये कोरापुट, मलकानगिरी, कालाहांडी, नबरंगपूर, नुआपाडा आणि बालनगीर जिल्ह्यांचा समावेश आहे. पण २२ प्रमुख नक्षलवादी शरण आल्यामुळे ओडिशातील नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००