Gaddar : गद्दारांच्या यादीत पहिले शरद पवार तर उद्धव ठाकरे दुस-या क्रमांकावर

त्यांच्याकडून 'गद्दार दिवस' साजरा करणे म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा'


मुंबई : इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्याशी गद्दारी केलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मांडीवर बसून सत्तेसाठी भाजपशी गद्दारी करुन काँग्रेसशी हातमिळवणी करणा-या उद्धव ठाकरे यांनी आता आम्हाला गद्दारीची भाषा शिकवण्याचा हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे. त्यांच्याकडून गद्दार दिवस (Gaddar din) साजरा करणे म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' असा प्रकार असल्याची खिल्ली शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उडवली आहे. (Latest Marathi News)



राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर!


त्याबरोबर ठाकरे गटातील अनेकजण शिंदे गटात येत असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखिल भाजपच्या वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. (Traitor day)


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील केवळ रडायचे नाटक करत होते, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. जे जयंत पाटील आज स्वत:च भाजपच्या वाटेवर आहेत ते म्हणतात पक्षाची स्थापना गद्दारीतून झाली आहे. आम्ही त्यांची चिंता करत नाही, असेही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.


शिरसाट म्हणाले की, 'जयंत पाटील इतके का रडत होते, तुम्हाला माहीत आहे का? कारण त्यांना माहीत आहे, उद्या काय घडणार आहे ते शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला तर मी काय करू? मी तर मेलोच, म्हणून ते ओक्साबोक्शी रडत होते बाकी काही नाही, ते राजीनामा दिल्यामुळे रडत नव्हते. त्यांचं रडणं वेगळं होतं. हे असे बोलणारे पटकन उड्या मारतात, म्हणून थोडे दिवस तुम्ही वाट पहा, तुम्हाला जयंत पाटील यांचं मार्गक्रमण कुठे तरी झालेलं दिसेल असंही संजय शिरसाट म्हणाले.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर संजय शिरसाट यांनी केलेल्या या दाव्यावर आता जयंत पाटील काय उत्तर देणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार