Ajit Pawar Vs Sanjay Raut : अजित पवारांनी झापल्यानंतर संजय राऊतांची सारवासारव

ठाकरे गटाच्या मेळाव्यात केले होते विधान


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) काहीतरी वक्तव्य करायचं आणि मग त्यावर आवाज उठवला गेला की अजबगजब विधाने करत सारवासारव करायची हे जणू समीकरणच झाले आहे. काल ठाकरे गटाच्या मेळाव्यात 'आम्ही महाविकास आघाडीमध्ये जोपर्यंत उद्धवजींची इच्छा आहे तोपर्यंत राहू. ते काही आमच्या हातात नाही. हे राजकारण आहे', असे स्पष्टच म्हटले होते. मात्र, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रतिक्रियेनंतर आपल्या विधानात त्यांनी सोयीस्कररित्या बदल केला आहे.


अजित पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, आमची आघाडी २५ वर्षे टिकणार आहे. तेव्हा २५ वर्षे टिकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय? प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे', असं म्हणत पवारांनी राऊतांना शुभेच्छा दिल्या.


तसेच आता संजय राऊतांना उपरती झाल्याने त्यांनी यावर सारवासारव करणारे स्पष्टीकरण दिले. त्यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला राहण्याची इच्छा आहे की नाही, याबाबत संजय राऊत स्वतःच संभ्रमात असावेत, असे चित्र दिसत आहे.


दरम्यान, अजित पवारांनी मविआबद्दल मी थेट उद्धव ठाकरेंनाच विचारेन, असं म्हटल्यामुळे संजय राऊतांच्या स्पष्टीकरणाला अजित पवारांच्या लेखी काही किंमत नसावी, असं दिसून येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.