Ajit Pawar Vs Sanjay Raut : अजित पवारांनी झापल्यानंतर संजय राऊतांची सारवासारव

ठाकरे गटाच्या मेळाव्यात केले होते विधान


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) काहीतरी वक्तव्य करायचं आणि मग त्यावर आवाज उठवला गेला की अजबगजब विधाने करत सारवासारव करायची हे जणू समीकरणच झाले आहे. काल ठाकरे गटाच्या मेळाव्यात 'आम्ही महाविकास आघाडीमध्ये जोपर्यंत उद्धवजींची इच्छा आहे तोपर्यंत राहू. ते काही आमच्या हातात नाही. हे राजकारण आहे', असे स्पष्टच म्हटले होते. मात्र, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रतिक्रियेनंतर आपल्या विधानात त्यांनी सोयीस्कररित्या बदल केला आहे.


अजित पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत म्हणायचे, आमची आघाडी २५ वर्षे टिकणार आहे. तेव्हा २५ वर्षे टिकेल असं वाटत होतं. आता पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यात चुकीचं काय? प्रत्येकाला आपला-आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे', असं म्हणत पवारांनी राऊतांना शुभेच्छा दिल्या.


तसेच आता संजय राऊतांना उपरती झाल्याने त्यांनी यावर सारवासारव करणारे स्पष्टीकरण दिले. त्यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला राहण्याची इच्छा आहे की नाही, याबाबत संजय राऊत स्वतःच संभ्रमात असावेत, असे चित्र दिसत आहे.


दरम्यान, अजित पवारांनी मविआबद्दल मी थेट उद्धव ठाकरेंनाच विचारेन, असं म्हटल्यामुळे संजय राऊतांच्या स्पष्टीकरणाला अजित पवारांच्या लेखी काही किंमत नसावी, असं दिसून येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन