Heatwave: उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने हाहाकार! तब्बल 'इतक्या' लोकांचा उष्णतेने मृत्यू...

पाटणा: देशभरात उन्हाचा पारा चढला असून, उत्तर भारतात उष्णतेची लाट आली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मागील दोन दिवसांत उष्णतेमुळे जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांत यूपीमध्ये ५४, तर बिहारमध्ये ४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ताप, धाप लागणे आणि आरोग्याच्या इतर समस्यांमुळे ४०० हून अधिक लोकांना गेल्या तीन दिवसांत बलिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बहुतांश रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.


बलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जयंत कुमार यांनी सांगितले की, अति उष्णतेमुळे सर्व रुग्णांची प्रकृती बिघडली आहे. तसेच, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि अतिसार, हे मृत्यूचे कारण आहे.


बिहारमध्ये पाटण्यात ३५, नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये १९ आणि पाटणा वैद्यकीय महाविद्याल तसेच रुग्णालयात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पाटण्याचे कमाल तापमान ४४.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पाटणा आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये २४ जूनपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणामध्ये २० जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे या राज्यातील नागरिकांना सावध राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेच्या लाटेच्या उद्रेकाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध आणि मजुरांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment

Rahul Gandhi : "मतदान वेळी आक्षेप घेतला नाही आणि आता २५ लाख बोगस मतदारांचा आरोप!" राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाचं थेट आव्हान!

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) हरियाणा विधानसभा निवडणुकीतही (Haryana Assembly

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मारवाडी मानसिकता थांबवू शकते’

आयसीएआर-सेंट्रल अॅरिड झोन रिसर्चचे संचालक डॉ. तंवर यांचे भाष्य जोधपूर : ऐतिहासिकदृष्ट्या राजस्थान आणि

‘वंदे भारत’साठी जोधपूरमध्ये पहिला देखभाल डेपो

मेंटेनन्सचा विषय निकाली; दिल्ली, मुंबई, बंगळूरुमध्येही होणार उभारणी जोधपूर  : जलद गतीने धावणारी वंदे भारत

सिग्नल ओव्हरशूट! छत्तीसगडमध्ये झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघाताचे कारण आले समोर

छत्तीसगड: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काल (४ नोव्हेंबर) सायंकाळी मेमू ट्रेनचा आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा

बिहारमध्ये कमळ फुलणार!

ओपनियन पोलच्या अंदाजानुसार एनडीएचे बिहारमध्ये सरकार नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६

मतदार यादी पुनरिक्षणविरोधात 'इंडिया'ची देशव्यापी आंदोलनाची योजना

नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर)