Rajavadi hospital : गर्भवती महिलेकडे नव-याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकारले

सामाजिक आणि रुग्णमित्र संस्थांनी व्यक्त केला रोष


घाटकोपर : सरकारी रुग्णालयांचा (Government Hospitals) ओंगळ कारभार अनेकदा समोर आला आहे. कधी कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे तर कधी सुविधा अपुर्‍या पडल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. गर्भवती महिलेकडे (Pregnant woman) आधारकार्ड (Aadhar card) नसल्याने उपचार नाकारल्याची घटना घाटकोपरमधील सरकारी राजावाडी रुण्यालयात घडली. या घटनेबाबत अनेक अनेक सामाजिक आणि रुग्णमित्र संस्थांनी रोष व्यक्त केला.


ही गर्भवती महिला नालेसफाईचे काम करते. नालेसफाईदरम्यान ती अचानक खड्ड्यात पडल्याने तिला उपचारांकरता राजावाडी रुग्णालयात (Rajavadi Hospital) आणण्यात आले. त्यावेळी तिच्याकडे नवर्‍याचे आधारकार्ड नसल्याने तिला उपचार नाकारण्यात आला व तिला घरी पाठवण्यात आले. यापूर्वी ती शताब्दी रुग्णालयात गेली होती मात्र तिथेही तिला अशीच वागणूक मिळाली. या प्रकरणात आरोग्य जनहक्क समिती धावून आली. निव्वळ आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्र नसल्यास गर्भवतीवर उपचार किंवा तपासणीच होत नसल्याच्या तक्रारी समितीने केल्या.


तक्रारींची दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी या घटनेबाबत परिपत्रकाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे. आधारकार्ड नसल्याच्या कारणाने गर्भवती महिलेवर उपचार करणे नाकारल्यास आणि तपासाविना परत पाठविल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच