Monsoon : मान्सून लांबले, भाजीपाल्याचे दर भडकले!

नवी मुंबई : जून महिना अर्धा सरला तरी पावसाने (Monsoon) ओढ दिल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी दोन महिन्यांपासून स्थिर असलेले भाजीपाल्याचे भाव आता वाढू लागले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाववाढ जाणवू लागली आहे. नजीकच्या काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.


गेल्या काही दिवसांत मागणीपेक्षा आवक वाढल्याने भाज्यांचे भाव उतरले होते. त्यामुळे बऱ्याच भाज्या घाऊक बाजारात १० ते १२ रु. किलो दराने मिळत होत्या. एप्रिल, मे महिन्यात तर भाज्यांचे घाऊक दर निम्म्यावर आले होते. नागरिक मोठ्या संख्येने गावी, परगावी गेल्याने मुंबईत भाजीपाल्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे भाज्यांचे दर कमी झाले होते. मात्र आता मुंबईकर परतल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे.


मात्र मागणी वाढलेली असतानाच पाऊस लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाव वाढल्याने मागणी असूनही भाजीपाल्याला उठाव मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.


किरकोळ बाजारात आत्तापर्यंत २० रु. किलोमध्ये मिळणारा टोमॅटो सध्या ४० रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात ८ ते १० रु. किलोपर्यंत असलेला टोमॅटो आता २२ ते २५ रु.पर्यंत पोहोचला आहे. तसेच कोथिंबिरीच्या दरातही दुप्पट वाढ झाली आहे. दहा रुपये एक जुडी असा भाव असलेली कोथिंबीर आता ३० रुपयांवर पोहोचली आहे.



भाजी सध्याचे दर मागील किरकोळ दर



  • भेंडी : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ४० ते ५०

  • फरसबी: सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ४० ते ६०

  • गवार: सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ६०

  • घेवडा : सध्याचा दर :६० ते ८० मागील किरकोळ दर :५० ते ६०

  • कारली : सध्याचा दर : ६० ते ८० मागील किरकोळ दर : ५० ते ५५

  • ढोबळी मिरची : सध्याचा दर : ७० ते ८० मागील किरकोळ दर : ६० ते ६५

  • शेवगा शेंग : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ५० ते ६०

  • सुरण : सध्याचा दर :८० ते ९० मागील किरकोळ दर : ६० ते ७०

  • मटार : सध्याचा दर :१०० ते ११० मागील किरकोळ दर : ६० ते ८०

  • हिरवी मिरची : सध्याचा दर : ८० ते ९० मागील किरकोळ दर : ५० ते ६०

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.