Kapol Vidyanidhi International School : कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावल्याने गोंधळ

शिक्षकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी


कांदिवली : राज्यात धार्मिक वादांमुळे वातावरण चिघळत असतानाच आता शाळा स्तरावरही धर्मावरुन तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील कपोल विद्यानिधी (kapol Vidyanidhi International school) शाळेत आज सकाळी प्रार्थनेच्या वेळी अजान (Azan) लावल्याने पालक संतापले व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त पालकांनी भाजप आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं सुरु केली. खबरदारीचे उपाय म्हणून पोलीस प्रशासनही तातडीने येथे दाखल झाले. या प्रकरणी ज्या शिक्षिकेकडून ही अजान लावण्यात आली तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


'आम्ही सर्व प्रकारच्या व सर्व धर्मातील प्रार्थना लावतो. त्यामध्ये गायत्री मंत्र असेल, कॅरोल सिंगिंग असेल किंवा मग इतर धर्मियांच्या प्रार्थना असतील त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी हा उपक्रम असतो', असं शाळेने स्पष्टीकरण दिल्यानंतर पालकांनी आणखी आक्रमक होऊन 'आम्हाला न्याय हवा आहे' (We want justice), 'कुछ तो शरम करो' अशी घोषणाबाजी केली. शाळेसारख्या ठिकाणी अजान लावण्याची गरजच काय? असा सवाल करत त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची पालकांनी मागणी केली.

दरम्यान, पालकांचा विरोध पाहता शाळा प्रशासनाने माफी मागितली व चूक झाली आहे त्यामुळे कारवाई होईल, असे आश्वासन दिले. मात्र त्यालाही न जुमानता आमदार योगेश सागर यांनी ही चूक नसून जाणूनबुजून हे कृत्य केल्याचा आरोप केला. ज्या शिक्षिकेने हे कृत्य केलं ती अल्पसंख्याक (Minority) आहे, त्यामुळे शाळेने जाणीवपूर्वक तिचं नाव समोर आणलेलं नाही असं वक्तव्यही त्यांनी केलं.


हा सगळा हिंदूंचा परिसर आहे. इथे अजान लाऊड स्पीकरवर का लावण्यात आली? आज शुक्रवार आहे त्यामुळे शाळेमध्ये अजान लावली का? हे काम कोणी केलं आहे? हा उपक्रम कशासाठी? हिंदू शाळेत अजान का लावण्यात आली? असे प्रश्न भाजप आमदार योगेश सागर यांनी उपस्थित केले. कारवाई झाल्याशिवाय आंदोलन शांत होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


दरम्यान शिवसेनेनेही पोलीस ठाण्यात निवेदन देऊन त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा