PCB : अहमदाबादची खेळपट्टी झपाटलेली आहे का?

Shahid Afridi : आफ्रिदीचा पीसीबीला (PCB) सवाल


कराची : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यास तयार नसल्याचे समजते. त्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पीसीबीच्या या वृत्तीवर टीका केली आहे. “ते अहमदाबादमध्ये खेळण्यास का नकार देत आहेत? ती खेळपट्टी आग ओकते की झपाटलेली आहे?


पुढे आफ्रिदी म्हणाला की, “जा, खेळा आणि जिंका. जर काही पूर्वनियोजित आव्हाने असतील तर त्यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जिंकणे. दिवसअखेरीस पाकिस्तान संघ जिंकला हे महत्त्वाचे आहे. सकारात्मक पद्धतीने घ्या. तुम्ही जा, खचाखच भरलेल्या भारतीय प्रेक्षकांसमोर जिंका आणि तुम्ही काय साध्य केले ते त्यांना सांगितले पाहिजे, असे आफ्रिदी म्हणाला.


ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास तीन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे, परंतु स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वेळापत्रकाला उशीर होण्यामागे एक प्रमुख कारण समोर आले आहे.


पीसीबी अजूनही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध साखळी सामना खेळण्यास तयार नाही. हे वेळापत्रकाच्या घोषणेला उशीर होण्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख