The Kapil Sharma Show : ‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्याची गर्लफ्रेंड म्हणाली, मरू….

Share

मीरा रोड: ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘वागळे की दुनिया’ अशा कॉमेडी शोमध्ये लहान लहान भूमिका करणाऱ्या अभिनेता तीर्थानंद राव याने फेसबुक लाइव्हदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी वेळीच पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. लिव्ह-इन पार्टनरबरोबर झालेल्या वादानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तीर्थानंदने दिली होती. या संपूर्ण प्रकरणावर त्याची लिव्ह- इन पार्टनर म्हणजेच गर्लफ्रेंडने प्रतिक्रिया दिली आहे.

“गर्लफ्रेंड आपला छळ करत आहे. मला तिच्यापासून वेगळं व्हायचं होतं. पण, तिने मला धमक्या देण्यास सुरुवात केली, माझ्यावर गुन्हाही दाखल केला. पोलिसांच्या भीतीने मी बरेच दिवस मी माझ्या घरी गेलो नाही, मला फूटपाथवर झोपावं लागलं. मी या गोष्टीला कंटाळलो आहे आणि त्यामुळेच मला आत्महत्या करायची इच्छा आहे,” असे आरोप तीर्थानंदने त्याच्या गर्लफ्रेंडवर केले होते.

पोलिसांनी अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केलं, त्यावेळी त्याची विचारपूस करून तिला रुग्णालयात बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तिने स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली, “मरू द्या त्याला, असंही मी त्याला सोडून जाणार होते.” दरम्यान, तीर्थानंद रावने यापूर्वी लॉकडाऊनमध्येही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काम मिळत नसल्याने आर्थिक चणचण भासू लागली आणि त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. आता दुसऱ्यांदा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

5 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

25 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

57 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago