India-vs-Pak : तिढा सुटला! आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामने 'येथे' होणार!

Asia Cup : ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान स्पर्धा रंगणार; हायब्रिड मॉडेलचा वापर



नवी दिल्ली : आशिया चषक २०२३ चे (Asia Cup) ठिकाण आणि तारखांचे कोडे (India vs Pakistan) अखेर सुटले आहे. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे निश्चित झाले आहे. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे, अशी घोषणा आशियाई क्रिकेट परिषदेने केली.


भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झालेली नसली, तरी स्पर्धेचा कालावधी समोर आला आहे. लवकर आशिया चषकाच्या वेळापत्रकाची घोषणा होणार आहे.


टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होण्याची शक्यता आहे. आशिया चषकाचा २०२३ चा हंगाम दोन ग्रुपमध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन ग्रुपमधील आघाडीचे प्रत्येकी दोन संघ सुपर फोरसाठी पात्र होतील. चारमधील आघाडीचे दोन संघ फायनलला पोहचतील.


तब्बल १५ वर्षांनंतर आशिया चषक पाकिस्तानमध्ये होत आहे. २००९ मध्ये श्रीलंका संघावर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये अनेक संघांनी क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. भारतामधील दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. दशकभरापासून भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला नाही. आशिया चषकाचे संपूर्ण आयोजन पाकिस्तानमध्ये व्हावे, यासाठी पीसीबी अडून बसले होते. पण भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आता हायब्रेड मॉडेल तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आता पाकिस्तानमध्ये चार, तर श्रीलंकामध्ये ९ सामने खेळवले जाणार आहेत.



पाकिस्तानमध्ये कोणते सामने होणार?


आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या गटातील चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. यामध्ये एका गटातील पाकिस्तान विरुद्ध नेपाळ आणि दुसऱ्या गटातील अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्या सामन्यांचा समावेश आहे.



श्रीलंकेत कोणते सामने होणार?


भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध नेपाळ हे सामने श्रीलंकेत ग्रुप स्टेजपासून होणार आहेत. यानंतर दोन्ही गटांतील टॉप-२ रँकिंगचे संघ सुपर-४मध्ये पोहोचतील. सुपर-४ चे सर्व सामने आणि फायनलसुद्धा श्रीलंकेत खेळवले जातील.

Comments
Add Comment

Suryakumar Yadav Ind vs Pak : सूर्याचा 'नादखुळा' अंदाज! पाकिस्तानला धूळ चारल्यावर ३ शब्दांत दिला विजयाचा मंत्र; काय लिहिलंय नेमकं?

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दारूण पराभव करत क्रिकेट

T20 World Cup 2026 IND vs PAK: हार्दिक पांड्या अन् कुलदीप यादवमध्ये राडा ? १८ व्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं ?

मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

T20 World Cup 2026 IND vs PAK: पाकिस्तान विरोधात भारताचा विजय; सोशल मीडियावर पाकिस्तानची नाचक्की

मुंबई: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला आहे. भारताने

पाकिस्तान विरोधात भारताचा विजय, सुपर 8 मध्ये दिमाखात एन्ट्री

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरूद्धचा साखळी सामना भारताने ६१ धावांनी जिंकला.