Biparjoy Cyclone : बिपरजॉयने बदलला मार्ग; रात्री धडकणार

  186

जाखाऊ बंदराजवळील किनारपट्टीला धोका


Biparjoy Cyclone : सध्या रौद्ररुप धारण केलेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या (Gujarat) दिशेनं सरकत असल्याची बातमी सकाळीच समोर आली होती. मात्र आता मिळत असलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकून गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र लगतच्या (kutch and Suarshtra) तसेच पाकिस्तान किना-यालगतच्या कराची आणि गुजरातमधील मांडवी दरम्यान असलेल्या जाखाऊ बंदराजवळील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ रात्री ९.३० च्या सुमारास धडकू शकते. किनारपट्टीवर आदळण्यापूर्वी वादळाचे स्वरुप मवाळ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी त्यात हानी पोहचवण्याची क्षमता आहे.


गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात बुधवारी जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हा वेग १४५ किमी प्रतिताशीपर्यंत पोहोचू शकतो. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये दोन ते तीन मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच सखल भागात पाणी भरू शकते. चक्रीवादळ कराची आणि मांडवी किनारपट्टी ओलांडेल तेव्हा वाऱ्याचा वेग ११५-१२५ किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी दिल्लीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.


या वादळादरम्यान खबरदारीचे उपाय म्हणून तब्बल ७४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच NDRF ची ३३ पथके तैनात करण्यात आली आहेत. कच्छ, सौराष्ट्र हा परिसर ओलांडल्यानंतर या वादळाचा प्रभाव १६ जून रोजी दक्षिण राजस्थानवर दिसणार आहे. १७ जूननंतर परिस्थिती सुधारू शकते. ६-७ जून रोजी आग्नेय अरबी समुद्रावर बिपरजॉय तयार झाले. यानंतर ११ जून रोजी त्याचे तीव्र वादळात रूपांतर झाले.



संबंधित बातम्या -

















Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )