Mira Road Murder Case : मीरा रोड हत्या प्रकरणात रोज होत आहेत धक्कादायक खुलासे

  213

सरस्वतीची हत्या कीटकनाशकाने झाल्याचा संशय


मीरा रोड (Crime story) : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य (Sarswati Vaidya) हत्या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी मनोज साने (Manoj Sane) वेगवेगळे दावे करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असला तरी पुराव्यामधून मात्र हत्या मनोज सानेनेच केली असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले होते. मात्र हत्येपूर्वी आरोपी मनोज सानेने बोरीवलीतील नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्यानेच हे कीटकनाशक सरस्वतीला पाजून तिची हत्या केली आहे का यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.


सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेले होते. त्या ठिकाणी झालेल्या चौकशीत हा खुलासा झाला आहे. साने आणि सरस्वती यांच्या मोबाईलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत.


केवळ हेच नव्हे तर आरोपी मनोज सानेच असल्याचे सांगणारा आणखी एक पुरावा आहे. मनोज सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमे-यात मृतदेहाचे तुकडे पिशवीत गुंडाळून घेऊन जाताना कैद झाला आहे. त्याचबरोबर आरोपी मनोज साने हा मृत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे टाकताना अत्यंत सावधगिरी बाळगत असल्याचंही सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. इमारतीची लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबल्यावरच तो मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन घराबाहेर पडत असल्याचे या फुटेजमध्ये दिसले आहे.



संबंधित बातम्या - 





Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा