Mira Road Murder Case : मीरा रोड हत्या प्रकरणात रोज होत आहेत धक्कादायक खुलासे

सरस्वतीची हत्या कीटकनाशकाने झाल्याचा संशय


मीरा रोड (Crime story) : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य (Sarswati Vaidya) हत्या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी मनोज साने (Manoj Sane) वेगवेगळे दावे करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असला तरी पुराव्यामधून मात्र हत्या मनोज सानेनेच केली असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले होते. मात्र हत्येपूर्वी आरोपी मनोज सानेने बोरीवलीतील नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्यानेच हे कीटकनाशक सरस्वतीला पाजून तिची हत्या केली आहे का यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.


सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेले होते. त्या ठिकाणी झालेल्या चौकशीत हा खुलासा झाला आहे. साने आणि सरस्वती यांच्या मोबाईलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत.


केवळ हेच नव्हे तर आरोपी मनोज सानेच असल्याचे सांगणारा आणखी एक पुरावा आहे. मनोज सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमे-यात मृतदेहाचे तुकडे पिशवीत गुंडाळून घेऊन जाताना कैद झाला आहे. त्याचबरोबर आरोपी मनोज साने हा मृत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे टाकताना अत्यंत सावधगिरी बाळगत असल्याचंही सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. इमारतीची लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबल्यावरच तो मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन घराबाहेर पडत असल्याचे या फुटेजमध्ये दिसले आहे.



संबंधित बातम्या - 





Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.