सिन्नर : समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना सिन्नरजवळील खंबाळे शिवारात भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात शिर्डी येथील चार जण ठार तर चार जण जबर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली.
हज यात्रेकरूंना सोडून हे सर्वजण शिर्डीला परतत होते. इन्होवा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळली. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात चौघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
अपघातात रज्जाक अहमद शेख (वय ५५), सत्तार शेखलाल शेख (वय ६५), सुलताना सत्तार शेख (वय ५०) हे जागीच ठार झाले. तर, फैयाज दगुभाई शेख (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (वय ३५), मैरूनिसा रज्जाक शेख (वय ४५), अझर बालन शेख (वय २५) मुस्कान अजहर शेख (वय २२) हे गंभीर जखमी झाले. मयत आणि जखमी सर्व शिर्डी येथील रहिवासी असून एकमेकांचे नातलग आहेत.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…