भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता राज ठाकरेंचाही समावेश

दादरच्या शिवतीर्थावर लागले बॅनर्स


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक नेत्यांचे समर्थक आपल्या नेत्याला भावी मुख्यमंत्रीपद मिळावे अशी स्वप्नं पाहत आहेत. मागील काही दिवसांत ज्या नेत्यांचे वाढदिवस झाले, त्यांचे 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करणारे बॅनर्स जागोजागी झळकले. अजित पवार, नाना पटोले, जयंत पवार, सुप्रिया सुळे यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचाही या यादीत समावेश झाला आहे.


राज ठाकरेंच्या १४ जूनला असलेल्या वाढदिवसानिमित्त दादरच्या शिवतीर्थावर बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर राज ठाकरेंचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. यंदा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे चित्र आहे. त्यात बॅनरबाजी हा चर्चेचा विषय ठरत आहे.


राज्यात पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असला तरी वाढदिवसानिमित्त भेटायला येणा-या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, मिठाई किंवा भेटवस्तू आणू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे. त्याऐवजी झाडांची रोपे आणि शैक्षणिक साहित्य घेऊन येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून

'अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा'

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान निर्देश मुंबई (खास

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या