Online Conversion : धर्मांतरप्रकरणी जबाबदार आरोपी शहानवाजला अटक; गाझियाबाद स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश

गाझियाबाद पोलीस शहानवाजला रस्ते मार्गाने नेणार


ठाणे : देशात घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांनंतर पोलीस प्रशासनही तितकेच तत्पर झाल्याचे दिसून येत आहे. धर्माधर्मांत तेढ वाढवण्याचे प्रकार करणा-यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल केला जात आहे. त्यातच पोलिसांच्या तत्परतेची आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंब्रा परिसरात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ४०० जणांच्या धर्मांतरप्रकरणी जबाबदार आरोपी शहानवाज मकसुद खानला ठाणे पोलिसांनी रविवारी अलिबाग येथून अटक केली आहे.


गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला शहानवाज हा त्याच्या भावासोबत अलिबागमधील एका लॉजमध्ये लपून बसला होता. ठाणे पोलीस आणि गाझियाबाद पोलीसांचे पथक अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. सुरुवातीला आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईलद्वारे आरोपी वरळी पोलिस ठाणे हद्दीत असल्याचा सुगावा लागला. पोलीस पथकाने त्वरित स्थानिक पोलिसांना संपर्क केला. परंतु आरोपी आलिबागला पळाला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ठाणे पोलिसांचे पथक रायगड जिल्ह्यातील अलिबागला रवाना झाले. त्यांनी अलिबाग मधील लॉज, हॉटेल्स व इतर संभावित ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका लॉजमध्ये शहानवाज असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. ठाणे पोलिसांच्या पथकाने त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क करून त्यांच्या मदतीने शाहनवाज याला अटक केली.


आज त्याला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने सांगितल्यानुसार शहानवाजला गाझियाबाद पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. तसेच शहानवाजला पुढील तीन दिवसात गाझियाबाद स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश गाझियाबाद पोलिसांना देण्यात आले आहेत. गाझियाबाद पोलीस शहानवाजला रस्ते मार्गाने घेऊन जाणार आहेत. दरम्यान, रस्त्यात वेळोवेळी ब्रेक घेऊन खाण्यापिण्याची व्यवस्था करावी तसेच त्याला सुरक्षित नेण्यात यावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत.



संबंधित बातमी - 

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च