पुणे : अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने मान्सूनच्या वाटचालीबाबत भीती निर्माण झाली होती. परंतु, हे चक्रीवादळ समुद्रात उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनच्या वाटचालीला आता पोषक वातावरण तयार झाले आहे. मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर रविवारी (११ जून) संपूर्ण गोव्यासह तळकोकणात दाखल झाला. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
केरळमध्ये यंदा मान्सून उशिरा ८ जूनला दाखल झाला. त्यामुळे त्याचा पुढील प्रवासही उशिराच होईल अशी अपेक्षा होती. मात्र अरबी समुद्रातील चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर दाखल झाला. वातावरण असेच राहिले तर येत्या ४८ तासांत मुंबईत, तर उर्वरित महाराष्ट्रात तो १५ ते १७ जूनदरम्यान दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत सोमवारी जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण... मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने…
नाशिक : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३ मतपत्रिका…
इनोव्हा कार ट्रकला धडकल्याने झाला अपघात यवतमाळ : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ…
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…