पुणे : अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने मान्सूनच्या वाटचालीबाबत भीती निर्माण झाली होती. परंतु, हे चक्रीवादळ समुद्रात उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनच्या वाटचालीला आता पोषक वातावरण तयार झाले आहे. मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर रविवारी (११ जून) संपूर्ण गोव्यासह तळकोकणात दाखल झाला. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
केरळमध्ये यंदा मान्सून उशिरा ८ जूनला दाखल झाला. त्यामुळे त्याचा पुढील प्रवासही उशिराच होईल अशी अपेक्षा होती. मात्र अरबी समुद्रातील चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर दाखल झाला. वातावरण असेच राहिले तर येत्या ४८ तासांत मुंबईत, तर उर्वरित महाराष्ट्रात तो १५ ते १७ जूनदरम्यान दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत सोमवारी जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…