‘बिपरजॉय’ चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने राज्यात पोषक वातावरण

पुणे : अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने मान्सूनच्या वाटचालीबाबत भीती निर्माण झाली होती. परंतु, हे चक्रीवादळ समुद्रात उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनच्या वाटचालीला आता पोषक वातावरण तयार झाले आहे. मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर रविवारी (११ जून) संपूर्ण गोव्यासह तळकोकणात दाखल झाला. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी ही माहिती दिली.


केरळमध्ये यंदा मान्सून उशिरा ८ जूनला दाखल झाला. त्यामुळे त्याचा पुढील प्रवासही उशिराच होईल अशी अपेक्षा होती. मात्र अरबी समुद्रातील चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने मान्सूनची वाटचाल गतीने झाली व तो अपेक्षेपेक्षा आठ दिवस लवकर दाखल झाला. वातावरण असेच राहिले तर येत्या ४८ तासांत मुंबईत, तर उर्वरित महाराष्ट्रात तो १५ ते १७ जूनदरम्यान दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.





दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत सोमवारी जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत