शरद पवारांच्या निर्णयावर 'सामना'मधून टीका; सुप्रिया सुळेंची मात्र नरमाईची भूमिका

ही दडपशाही नव्हे, लोकशाही आहे : सुप्रिया सुळे


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी १० जूनला राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र उबाठा सेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. 'एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष का?' असा सवाल सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी मात्र 'ही लोकशाही आहे, इथे कोणलाही काहीही बोलण्याचा अधिकार' म्हणत नरमाईची भूमिका घेतली आहे.


'काही जणांच्या मते शरद पवार यांनी भाकरी फिरवली, पण त्यात काही दम वाटत नाही. भाकरी फिरवली नसून ती आता कुठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवीन भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल', अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.


यावर सुप्रिया सुळे शांतपणे म्हणाल्या, 'ही दडपशाही नव्हे, लोकशाही आहे. त्यामुळे कुणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. त्यात गैर काय? ते त्यांचं मत आहे'. त्यामुळे महाविकास आघाडीतच फूट असली तरी सुप्रिया सुळेंनी त्यावर काहीही बोलायचे टाळले आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन