Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाभारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यावर पावसाचे सावट!

भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यावर पावसाचे सावट!

ऑस्ट्रेलियन चाहत्यांची चिंता वाढली तर भारतीय चाहत्यांना झाला आनंद

लंडन : लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या जेतेपदाच्या लढतीत तीन दिवस खेळले गेले असून चौथ्या आणि पाचव्या दिवशीच्या खेळीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. येथील स्थानिक हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियन चाहत्यांची चिंता वाढली असून भारतीय चाहत्यांना मात्र आनंद झाला आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. ऑस्ट्रेलियन संघ आज भारतासमोर मोठे लक्ष्य ठेवू इच्छितो. परंतू Accuweather या हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, केवळ चौथ्या दिवशीच नाही तर पाचव्या दिवशी आणि सोमवारी राखीव दिवशीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

आज चौथा दिवस असून दिवसभरात ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी ३.८८ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्याचवेळी, सुमारे एक तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लंडनमध्ये शनिवारी दुपारी २ ते ९ या वेळेत वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे चालू असलेल्या सामन्यावर नजर टाकली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या खेळावर याचा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, शनिवारनंतर रविवारी लंडनमध्ये ८८ टक्के पाऊस आणि सोमवारी ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा खेळावर परिणाम होऊ शकतो.

मात्र ड्रेनेजची व्यवस्था चांगली असल्याने दिवसभर वाहून जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र दोन दिवसांत काही शक्य झाले नाही तर सहाव्या दिवशी निकालासाठी सामना होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -