Ashadhi Ekadashi 2023: तुकोबा निघाले विठुरायाच्या भेटीला!

मंगलमय वातावरणात तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान


पूणे: मुखात विठू माऊलीचे नाव, ग्यानबा तुकारामचा जयघोष, पांढरीशुभ्र बाराबंदी, गळ्यात तुळशीच्या माळा, भाळी टिळा, हातात वीणा अशा मंगलमय वातावरणात देहूनगरीमध्ये तुकोबांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे.


तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानाचा प्रारंभ आज देहू येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा उद्या आळंदीतून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झालेत.


श्रीक्षेत्र देहू संस्थान कमिटीच्या वतीने आज पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, तुकोबांचे मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज महापूजा झाली. परंपरेनुसार तपोनिधी नारायण महाराजांच्या पूजनानंतर काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारानंतर महाप्रसाद आणि महानैवेद्य दाखविल्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झाली.



तुकोबांच्या पादुका वाजत गाजत मिरवत शिळा मंदिरात आणण्यात आल्या. मंदिरात पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर मान्यवर अतिथी, विश्वस्त, संस्थानचे पदाधिकारी, मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकोबांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला. मानकरी आणि सेवेकऱ्यांनी तुकोबांच्या पादुका मस्तकी धारण करून मंदिर प्रदक्षिणा केली. त्यानंतर कीर्तनसेवा होऊन, अभंगांच्या गजरात दर्शनबारीला सुरुवात झाली.



तुकोबांची पालखी आज रात्री आजोळघरी


प्रस्थान सोहळ्यानंतर तुकोबांच्या पादुका पालखीत विराजमान करून नगर प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर तुकोबांचा पालखी सोहळा रात्रीच्या पहिल्या मुक्कामासाठी आपल्या आजोळघरी म्हणजे देहूनगरीतील इनामदार वाड्यात विश्रांती घेईल. रविवारी पहाटे लक्षावधी वारकऱ्यांच्या साथीने हा पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ होईल.

Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह