पूणे: मुखात विठू माऊलीचे नाव, ग्यानबा तुकारामचा जयघोष, पांढरीशुभ्र बाराबंदी, गळ्यात तुळशीच्या माळा, भाळी टिळा, हातात वीणा अशा मंगलमय वातावरणात देहूनगरीमध्ये तुकोबांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे.
तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानाचा प्रारंभ आज देहू येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा उद्या आळंदीतून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झालेत.
श्रीक्षेत्र देहू संस्थान कमिटीच्या वतीने आज पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, तुकोबांचे मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज महापूजा झाली. परंपरेनुसार तपोनिधी नारायण महाराजांच्या पूजनानंतर काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारानंतर महाप्रसाद आणि महानैवेद्य दाखविल्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झाली.
तुकोबांच्या पादुका वाजत गाजत मिरवत शिळा मंदिरात आणण्यात आल्या. मंदिरात पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर मान्यवर अतिथी, विश्वस्त, संस्थानचे पदाधिकारी, मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकोबांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला. मानकरी आणि सेवेकऱ्यांनी तुकोबांच्या पादुका मस्तकी धारण करून मंदिर प्रदक्षिणा केली. त्यानंतर कीर्तनसेवा होऊन, अभंगांच्या गजरात दर्शनबारीला सुरुवात झाली.
प्रस्थान सोहळ्यानंतर तुकोबांच्या पादुका पालखीत विराजमान करून नगर प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर तुकोबांचा पालखी सोहळा रात्रीच्या पहिल्या मुक्कामासाठी आपल्या आजोळघरी म्हणजे देहूनगरीतील इनामदार वाड्यात विश्रांती घेईल. रविवारी पहाटे लक्षावधी वारकऱ्यांच्या साथीने हा पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ होईल.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…