सुनील गावस्कर आणि हरभजन सिंग का झाले रोहित शर्मावर नाराज?

सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्री करताना काढला राग


लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघांमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) च्या अंतिम फेरीत टीम इडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही वेळाने फायनलची प्लेईंग इलेव्हन जाहीर होताच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्यात भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचेही नाव आहे. कॉमेंट्री करताना त्यांनी आपला राग काढला.


सुनील गावस्कर यांनी प्लेइंग-११ वर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळपट्टीच्या बाबतीत वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले. परंतु ते म्हणाले की, प्लेइंग-११ मध्ये फक्त एकच फिरकी गोलंदाज दिसला तो रवींद्र जडेजा. अनुभवी फिरकी मास्टर आर अश्विनला संघात स्थान देण्यात आले नाही. तो टीम इंडियासाठी दीर्घ फॉरमॅटमध्ये विकेट घेणारा गोलंदाज आहे. संघाला अंतिम फेरीत नेण्यात अश्विनचे ​​मोलाचे योगदान आहे.


अश्विनच्या गैरहजेरीवर कॉमेंट्रीदरम्यान प्रश्न उपस्थित करताना गावसकर म्हणाले, 'अश्विन संघात नसल्याचं मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळेच टीम इंडिया इथपर्यंत पोहोचली आहे. अश्विन या विकेटवर कोणतेही मोठे नुकसान करत नाही. उमेश यादवच्या जागी अश्विनचा संघात समावेश करता आला असता. सुनील गावस्कर यांच्यानंतर हरभजन सिंगनेही त्यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले.


पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांत ३ गडी गमावून ३२७ धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ नाबाद ९५ आणि ट्रॅव्हिस हेड नाबाद १४६ धावांवर खेळत आहे.


टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए