सुनील गावस्कर आणि हरभजन सिंग का झाले रोहित शर्मावर नाराज?

  119

सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्री करताना काढला राग


लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघांमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) च्या अंतिम फेरीत टीम इडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही वेळाने फायनलची प्लेईंग इलेव्हन जाहीर होताच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्यात भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचेही नाव आहे. कॉमेंट्री करताना त्यांनी आपला राग काढला.


सुनील गावस्कर यांनी प्लेइंग-११ वर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळपट्टीच्या बाबतीत वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले. परंतु ते म्हणाले की, प्लेइंग-११ मध्ये फक्त एकच फिरकी गोलंदाज दिसला तो रवींद्र जडेजा. अनुभवी फिरकी मास्टर आर अश्विनला संघात स्थान देण्यात आले नाही. तो टीम इंडियासाठी दीर्घ फॉरमॅटमध्ये विकेट घेणारा गोलंदाज आहे. संघाला अंतिम फेरीत नेण्यात अश्विनचे ​​मोलाचे योगदान आहे.


अश्विनच्या गैरहजेरीवर कॉमेंट्रीदरम्यान प्रश्न उपस्थित करताना गावसकर म्हणाले, 'अश्विन संघात नसल्याचं मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळेच टीम इंडिया इथपर्यंत पोहोचली आहे. अश्विन या विकेटवर कोणतेही मोठे नुकसान करत नाही. उमेश यादवच्या जागी अश्विनचा संघात समावेश करता आला असता. सुनील गावस्कर यांच्यानंतर हरभजन सिंगनेही त्यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले.


पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांत ३ गडी गमावून ३२७ धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ नाबाद ९५ आणि ट्रॅव्हिस हेड नाबाद १४६ धावांवर खेळत आहे.


टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला