सुनील गावस्कर आणि हरभजन सिंग का झाले रोहित शर्मावर नाराज?

सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्री करताना काढला राग


लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघांमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) च्या अंतिम फेरीत टीम इडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही वेळाने फायनलची प्लेईंग इलेव्हन जाहीर होताच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्यात भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचेही नाव आहे. कॉमेंट्री करताना त्यांनी आपला राग काढला.


सुनील गावस्कर यांनी प्लेइंग-११ वर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळपट्टीच्या बाबतीत वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले. परंतु ते म्हणाले की, प्लेइंग-११ मध्ये फक्त एकच फिरकी गोलंदाज दिसला तो रवींद्र जडेजा. अनुभवी फिरकी मास्टर आर अश्विनला संघात स्थान देण्यात आले नाही. तो टीम इंडियासाठी दीर्घ फॉरमॅटमध्ये विकेट घेणारा गोलंदाज आहे. संघाला अंतिम फेरीत नेण्यात अश्विनचे ​​मोलाचे योगदान आहे.


अश्विनच्या गैरहजेरीवर कॉमेंट्रीदरम्यान प्रश्न उपस्थित करताना गावसकर म्हणाले, 'अश्विन संघात नसल्याचं मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळेच टीम इंडिया इथपर्यंत पोहोचली आहे. अश्विन या विकेटवर कोणतेही मोठे नुकसान करत नाही. उमेश यादवच्या जागी अश्विनचा संघात समावेश करता आला असता. सुनील गावस्कर यांच्यानंतर हरभजन सिंगनेही त्यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले.


पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांत ३ गडी गमावून ३२७ धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ नाबाद ९५ आणि ट्रॅव्हिस हेड नाबाद १४६ धावांवर खेळत आहे.


टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी

भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा