सद्गुरू वाचोनि सापडेना सोय

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


मी माझ्या प्रवचनांतून हे बरेचदा सांगितले आहे की, सत् चित् आनंद हे जे शब्द आहेत, त्या सच्चिदानंद स्वरूपालाच देव असे म्हटलेले आहे. त्याला आपण वेगवेगळी नावे दिली ते वेगळे. मात्र खरा देव कोण या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे सच्चिदानंद स्वरूप हाच खरा देव. या ठिकाणी प्रामुख्याने दिव्य ज्ञान आहे, दिव्य जाणीव आहे व दिव्य शक्ती आहे. खूप काही आहे व ते सगळे दिव्य आहे, इतकेच नव्हे, तर त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट दिव्य आहे. त्याचे ज्ञान दिव्य, त्याची निर्मिती दिव्य, त्याचा आनंद दिव्य, त्याची शक्ती दिव्य. तो सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. असे एकही ठिकाण नाही की, तो तेथे नाही व तो सर्व ठिकाणी भरलेला आहे, हे समजून घेतानाच लोकांची गडबड होते.



लोक विचारतात की जर तो सर्व ठिकाणी भरलेला आहे, तर तो अनुभवाला का येत नाही? याचे कारण असे की, एखादी गोष्ट जितकी अधिक सूक्ष्म तितकीच ती आपल्याला सहजासहजी अनुभावाला येण्याची शक्यता कमी. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पाच तत्त्वे आहेत. या पाच तत्त्वांपैकी पृथ्वी सहज डोळ्यांना दिसते व ती स्थूल आहे, परिमित आहे, उपयुक्त आहे पण ती लिमिटेड आहे. यापुढे पाणी हे तत्त्व पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म आहे. मात्र पृथ्वीपेक्षा जास्त उपलब्ध आहे व जास्त उपयुक्त आहे. प्रकाश हे तत्त्व या दोन तत्त्वांपेक्षा सूक्ष्म आहे. तो सर्व ठिकाणी प्राप्त होतो, त्यासाठी पैसे खर्च करावा लागत नाही. पाणी तरी दुर्मीळ होते. मात्र प्रकाशाचे तसे नाही. हा पहिल्या दोन तत्त्वांपेक्षा अधिक उपयुक्त, अपिरिमित व जास्त व्यापक आहे. यांच्यापलीकडे वायू म्हणजे हवा. ही पहिल्या तीन तत्त्वांपेक्षा अधिक महत्त्वाची, अत्यंत सूक्ष्म, अधिक उपलब्ध, अधिक उपयुक्त. केव्हाही व कुठेही उपलब्ध. जिथे तुमचे नाक जाईल, तिथे हवा उपलब्ध. सुदैवाने हवेचा काळाबाजार करता आलेला नाही. तो जर करता आला असता, तर काय परिस्थिती आली असती? प्रकाश आणि हवा यांचा काळाबाजार करता येत नाही मात्र पाण्याचा काळाबाजार होतो. हवा पहिल्या तीन तत्त्वांपेक्षा अत्यंत सूक्ष्म, अत्यंत उपयुक्त, जास्त उपलब्ध ही गोष्ट ध्यानात आली, तर पुढचे जे तत्त्व आहे ते आकाश.



आकाश सर्व ठिकाणी आहे. अनंत कोटी ब्रह्मांडे आकाशात आहेत. सगळीकडे ते दिसते. आकाश इतके आवश्यक आहे की, आकाशाशिवाय आपण असूच शकत नाही. तुम्ही आम्ही सर्व आकाशात आहोत. ते सगळीकडे उपलब्ध आहे. ते अत्यंत सूक्ष्म मात्र अतिशय उपयुक्त आहे. त्या पलीकडे Conscious Mind आहे. हे जे Conscious Mind आहे, त्यालाच ‘चित्ताकाश’ म्हणतात. सगळीकडे जे आहे ते ‘भूतकाश’. हे चित्ताकाश हे पहिल्या सर्व तत्त्वांपेक्षा अत्यंत सूक्ष्म अत्यंत उपयुक्त व सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. त्याहीपलीकडे आहे Cosmic Life Force. जे सर्व तत्त्वांपेक्षा अत्यंत अधिक सूक्ष्म, अत्यंत अधिक उपलब्ध व अत्यंत अधिक उपयुक्त आहे.



एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात, ‘God is life and life principle is flowing through you’. Tendency of life हा शब्द बरोबर आहे. God is life and life is god. या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त करायचे असते ते सद्गुरूंकडून, सद्गुरूकृपेनेच. म्हणूनच ‘सद्गुरू वाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी’.

Comments
Add Comment

कोजागिरी पौर्णिमा आज! दूध चंद्रप्रकाशात कधी ठेवाल? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

मुंबई: हिंदू धर्मात अश्विन महिन्यातील पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून विशेष महत्त्व

कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या गणेशाच्या बारा अवतारांचे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या