राज्यातील सर्व वसतिगृहात विद्यार्थिनी सुरक्षित आहेत काय?

'त्या' हत्येनंतर मुलींच्या सर्व वसतिगृहांच्या पाहणीसाठी समिती स्थापन


मुंबई : मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले या शासकीय वसतिगृहात झालेल्या विद्यार्थिनीच्या हत्येची चौकशी करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व वसतिगृहात विद्यार्थिनी सुरक्षित आहेत काय, याचा अहवाल १५ जून पर्यंत मागवला आहे.


या वसतिगृहातील सुरक्षारक्षकानेच मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली, असा अंदाज असून या रक्षकाचा मृतदेह रेल्वेमार्गावर आढळला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तीन तपास पथकांद्वारे गुन्ह्याचा शोध सुरु केला आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या या वसतिगृहात नेमके काय झाले याचा अहवाल निपुण विनायक यांची एकसदस्यीय समिती तातडीने सादर करणार आहे.


विद्यार्थिनीच्या हत्येचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. शासन या घटनेकडे गंभीरपणे पाहात असून उच्च शिक्षण सचिव आणि तंत्र शिक्षण सचिवांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती राज्यातील वसतिगृहांची पाहणी करणार आहे. अमरावती विभागाच्या शिक्षण सहसंचालक नलिनी टेंभेकर, मुंबई विभागाचे उपसंचालक केशव तुपे आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयातील डॉ. सोनाली रोडे या पाच सदस्यीय समितीचे सदस्य असतील. १५ जून पर्यंत ही समिती अहवाल सादर करेल.


दरम्यान, मुंबईत झालेल्या या हत्येबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार अत्यंत आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी सरळ मरिन लाइन्स पोलीस स्थानक गाठले. मुंबईत ज्या रस्त्यावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वोच्च अधिकारी प्रवास करतात, त्या रस्त्यावरील वसतिगृहात अशी घटना घडणे धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासमवेत आमदार अमोल मिटकरीही होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी 'हेच का सरकारचे बेटी पढाव अभियान,' अशा शब्दांत टीका केली आहे.

Comments
Add Comment

Akola News : पाडव्याआधीच 'काळाचा घाला'! ऐन दिवाळीत भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार; अकोल्यात शोककळा

अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या

Pune Saras Baug : पुणेकरांच्या उत्साहाला गालबोट; सारस बागेत वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांची तातडीने मध्यस्थी

पुणे : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या धमक्यांमुळे यंदा चर्चेत असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग दिवाळी पाडवा

नागपुरात फटाक्यांचा 'धुमाकूळ'! रात्रभरात सहा ठिकाणी आगीच्या घटना; मोठे नुकसान

नागपूर: दिवाळीच्या दिवसांत नागपुरात फटाक्यांची आतषबाजी आणि निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीच्या घटनांनी मोठी

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली