कोल्हापूरातील दंगलीमागे उद्धव ठाकरेंचा हात!

भाजप आमदार नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप


कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कोल्हापूरमध्ये दंगली घडवण्यामागे हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.


राज्यात औरंगजेबावरचे प्रेम अचानक आलेले नाही, त्यामागे निश्चित सूत्र आहे. काही महिन्यांपासून संजय राऊत महाराष्ट्र राज्यात दंगल होणार आहे, असे बोलत आहे, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहेत का? उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्यांना मोगलाईचे राज्य आणायचे असेल तर स्वराज्य रक्षणासाठी आम्ही लढायला तयार आहोत, असा इशारा राणेंनी दिला आहे.


याआधी कोल्हापूरमधील मटण मार्केट, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी बाजार आणि सीपीआर हॉस्पिटलच्या मागील बाजूला दगडफेक झाल्याची माहिती आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिकांडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला असल्याचे समजते.


हे सगळं कोण घडवतंय याचा विचार करायला पाहिजे. याकूब मेमन व औरंगजेबाच्या थडग्याचे सुशोभिकरण कोणी केले? तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कोल्हापूरचा काँग्रेसचा नेता सांगतो की, दंगल होऊ शकते आणि लगेच काही जण औरंगजेबाचे स्टेटस ठेवतात. या सगळ्यांवर सरकारची नजर आहे. हे हिंदुत्ववादी सरकार आहे. येथे काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही किंवा हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री नाही. राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई निश्चितपणे होणारच, असे राणे म्हणाले.


दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनी सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कालपासून कोल्हापूर शहरातील वातावरण तापले आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली होती. अशातच काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर जमावाने सुमारे ३ तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली. तसेच ‘जय श्रीराम’चा नारा देत या घटनेतील संशयितांवर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केले.

Comments
Add Comment

Miss India Earth 2019 : आतिफशी लग्न, मग धर्म परिवर्तन, आणि पुन्हा हिंदू धर्म.... या मिस इंडियाने पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे : ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ किताब जिंकलेली सायली सुर्वे सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सायली

म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्राच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ULB) ग्रीन

Heat Wave Alert: उन्हाची तीव्रता वाढली, राज्यातील 'या' जिल्ह्यांना हीट वेव्हचा इशारा

मुंबई: उन्हाळा वेळेआधीच तीव्र होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानाने पस्तिशी

Gas Cylinder: गॅस नियमांत मोठे बदल; पुण्यातील 'या' ग्राहकांना आता मिळणार नाही गॅस सिंलिंडर

पुणे: तुम्ही जर घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापासून KYC (केवायसी)

Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Pune Traffic Update: पुणेकरांनो पोलीस भरतीमुळे 'या' भागातील वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर जाण्याआधी...

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई (चालक) पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील अत्यंत