विधानसभा उपाध्यक्षांना अजित पवारच मुख्यमंत्री हवेत!

  252

दादा गरम आहेत पण नरम आहेत : नरहरी झिरवाळ


सुरगाणा : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना वेळ असला तरी भावी मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा आणि आडाखे बांधले जात आहेत. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजीही सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला धुमारे फुटले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार बनविण्याची संधी मिळालीच किंवा शह कटशहाच्या राजकारणातून संधी मिळवलीच तर मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचे हा पक्ष नेतृत्वासाठी तसा कळीचा मुद्दा आहे. सुप्रिया सुळे की अजित पवार? की आणखी तिसरा कुणी? यासारखे प्रश्न आतापासून चर्चेत असतांना विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मात्र अजित पवार यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मनातली इच्छा बोलून दाखवली आहे.


ही इच्छा बोलून दाखवताना नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली. 'फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अनेक गुणही विषद केले. राज्यभरातून येणाऱ्या लोकांना अजित पवार यांच्याबद्दल काय वाटतं तेही नरहरी झिरवळ यांनी बोलून दाखवलं. बरेच लोक म्हणतात की, दादा गरम आहेत, मात्र दादा कामाच्या बाबतीत आग्रही असतात त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे अनेकांना त्यांचा धाक वाटतो. असं नरहरी झिरवाळ यांचं मत आहे.


विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामाविषयी सांगताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, कामाच्या पातळीवर अजित पवार म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना अजितदादा यांच्यापेक्षाही आपण स्ट्रिक्ट झाले पाहिजे. त्यांच्या कामामुळेच आता अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना झिरवाळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तर तेच माझ्याकडे येतात आणि त्यांनाच माझ्याकडे यावं लागतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विधान सभा उपाध्यक्षांच्या मनातील या भावी मुख्यमंत्र्याविषयीच्या भावना राष्ट्रवादीत नवा वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्या नाही तरच नवल.

Comments
Add Comment

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा