विधानसभा उपाध्यक्षांना अजित पवारच मुख्यमंत्री हवेत!

  247

दादा गरम आहेत पण नरम आहेत : नरहरी झिरवाळ


सुरगाणा : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना वेळ असला तरी भावी मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा आणि आडाखे बांधले जात आहेत. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजीही सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला धुमारे फुटले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार बनविण्याची संधी मिळालीच किंवा शह कटशहाच्या राजकारणातून संधी मिळवलीच तर मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचे हा पक्ष नेतृत्वासाठी तसा कळीचा मुद्दा आहे. सुप्रिया सुळे की अजित पवार? की आणखी तिसरा कुणी? यासारखे प्रश्न आतापासून चर्चेत असतांना विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मात्र अजित पवार यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी मनातली इच्छा बोलून दाखवली आहे.


ही इच्छा बोलून दाखवताना नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली. 'फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी अनेक गुणही विषद केले. राज्यभरातून येणाऱ्या लोकांना अजित पवार यांच्याबद्दल काय वाटतं तेही नरहरी झिरवळ यांनी बोलून दाखवलं. बरेच लोक म्हणतात की, दादा गरम आहेत, मात्र दादा कामाच्या बाबतीत आग्रही असतात त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे अनेकांना त्यांचा धाक वाटतो. असं नरहरी झिरवाळ यांचं मत आहे.


विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामाविषयी सांगताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, कामाच्या पातळीवर अजित पवार म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना अजितदादा यांच्यापेक्षाही आपण स्ट्रिक्ट झाले पाहिजे. त्यांच्या कामामुळेच आता अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना झिरवाळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तर तेच माझ्याकडे येतात आणि त्यांनाच माझ्याकडे यावं लागतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विधान सभा उपाध्यक्षांच्या मनातील या भावी मुख्यमंत्र्याविषयीच्या भावना राष्ट्रवादीत नवा वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्या नाही तरच नवल.

Comments
Add Comment

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही