नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-नागपूर महामार्गावर शनिवारी रात्री खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.


मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणारी कार आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली. नागभीड-नागपूर महामार्गावर कानमपा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती आहे. जखमीला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहा झाली आहे.


मृतांमध्ये एका चिमुलकलीसह चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये पाच नागपूर जिल्ह्यातील आणि एक भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताची ओळख पटवली.


रोहन विजय राऊत (३०), ऋषिकेश विजय राऊत (२४), गीता विजय राऊत (४५), सुनीता रूपेश फेंडर (४०), प्रभा शेखर सोनवणे (३६) आणि यामिनी रूपेश फेंडर (९) ही मृतांची नावे आहेत.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद