पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोरमध्ये दाखल

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी बालासोरमध्ये दाखल झाले आहेत.


अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी अनेक मदतनीस, स्वयंसेवी संस्था घटनास्थळावर धावपळ करत आहेत. या अत्यंत भीषण अपघातामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वेच्या बोगी एकावर एक आदळल्याने त्यांचे कटिंग करणे कठीण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व मदतकार्याचा आढावा घेणार आहेत. तसेच कटक रुग्णालयात जाऊन ते जखमींची विचारपूस करणार आहेत. तसेच ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची पंतप्रधान भेट घेऊन त्यांच्याशी बातचीच करणार आहेत.


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकाळीच या घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आपल्या कार्यालयात या अपघातामागची कारणे काय असावीत यासंबंधी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी थेट ओडिसामध्ये पोहोचले.

Comments
Add Comment

Iran Israel War : खामेनी यांच्या निधनावर भारताची श्रद्धांजली; परराष्ट्र सचिव यांनी दिली इराणी दूतावासाला भेट

भारत सरकारतर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट देऊन इराणचे दिवंगत

Sukhoi Su-30 MKI Crashes: भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; टेकऑफनंतर बेपत्ता, पायलटचे काय झाले?

मुंबई: भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई-३० लढाऊ विमानाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या