पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोरमध्ये दाखल

  108

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी बालासोरमध्ये दाखल झाले आहेत.


अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी अनेक मदतनीस, स्वयंसेवी संस्था घटनास्थळावर धावपळ करत आहेत. या अत्यंत भीषण अपघातामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वेच्या बोगी एकावर एक आदळल्याने त्यांचे कटिंग करणे कठीण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व मदतकार्याचा आढावा घेणार आहेत. तसेच कटक रुग्णालयात जाऊन ते जखमींची विचारपूस करणार आहेत. तसेच ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची पंतप्रधान भेट घेऊन त्यांच्याशी बातचीच करणार आहेत.


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकाळीच या घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आपल्या कार्यालयात या अपघातामागची कारणे काय असावीत यासंबंधी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी थेट ओडिसामध्ये पोहोचले.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.