पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोरमध्ये दाखल

  105

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी बालासोरमध्ये दाखल झाले आहेत.


अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी अनेक मदतनीस, स्वयंसेवी संस्था घटनास्थळावर धावपळ करत आहेत. या अत्यंत भीषण अपघातामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वेच्या बोगी एकावर एक आदळल्याने त्यांचे कटिंग करणे कठीण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व मदतकार्याचा आढावा घेणार आहेत. तसेच कटक रुग्णालयात जाऊन ते जखमींची विचारपूस करणार आहेत. तसेच ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची पंतप्रधान भेट घेऊन त्यांच्याशी बातचीच करणार आहेत.


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकाळीच या घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आपल्या कार्यालयात या अपघातामागची कारणे काय असावीत यासंबंधी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी थेट ओडिसामध्ये पोहोचले.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व