Happy Anniversary : बॉलिवूडच्या 'या' गोल्डन जोडप्याचा लग्नाचा आज ५०वा वाढदिवस

सोशल मीडियात गाजतोय, शुभेच्छांचा वर्षाव!


मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय आणि लाडकी जोडी अर्थात महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा आज लग्नाचा ५०वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांची कन्या श्वेता बच्चन आणि नात नव्या यांनी देखिल सोशल मीडियावर काही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.





श्वेता बच्चनने 'बिग बी’ आणि जया बच्चन यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिने ‘हॅप्पी ५०, आता तुम्ही “गोल्डन” आहात. एकदा माझ्या आईला विचारण्यात आले होते की, सुखी संसाराचे सिक्रेट काय असते? तेव्हा तिने उत्तर दिले, प्रेम. मला वाटते की, माझे वडील, 'पत्नी नेहमीच बरोबर असते, असा विचार करतात', असे तिने यावेळी कॅप्शन लिहिले आहे.


श्वेताची मुलगी नव्याने देखील सोशल मीडियावर अमिताभ आणि जया यांचा एका सिनेमाच्या सेटवर असलेला फोटो शेअर केला आहे.



तसेच बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ’५० वर्ष झाली आहेत. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि आदर याबद्दल मी तुमचे आभार मानतो. १९७३ मध्ये जया बच्चन आणि बिग बी यांनी लग्नगाठ बांधली होती. आजही दोघे पूर्वीप्रमाणेच एकमेकांवर प्रेम करतात. या व्यतिरिक्त, प्रत्येक कठीण परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना पूर्ण पाठींबा देतात. प्रत्येक वेळी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बिग बी सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करतात आणि यावेळीसुद्धा त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. आजच्या या खास दिवशी बिग बींनी आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.


अमिताभ आणि जया यांचे लग्न अचानक झाले होते. ‘जंजीर’ चित्रपटाच्या यशानंतर सर्व मित्र सेलिब्रेशनसाठी लंडनला जाण्याची तयारी करत होते, जया देखील त्यांच्यासोबत लंडनला जाणार होत्या. मात्र, वडील हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे दोघांनाही त्याच दिवशी लग्न करावे लागले.


खरं तर, लंडनला जाणाऱ्या मित्रपरिवारात जया देखील आहेत, हे जेव्हा हरिवंश राय बच्चन यांना समजले तेव्हा ते म्हणाले की, जया आणि अमिताभ यांना लंडनला एकत्र जायचे असेल तर, दोघांनाही आधी लग्न करावे लागेल. याच कारणास्तव, दोघांनी लंडनला जाण्यापूर्वी ३ जून १९७३ रोजी एका साध्या घरगुती सोहळ्यात लग्न केले आणि त्याच दिवशी दोघे हनिमूनसाठी थेट लंडनला रवाना झाले होते.

Comments
Add Comment

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित

Sakhe G Sajani : 'सखे गं साजणी'तून उलगडणार तीन मित्रांची रंजक गोष्ट; ही' तगडी स्टारकास्ट झळकणार मुख्य भूमिकेत

मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक

‘Vadh 2’ movie review : 'वध २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता-संजय मिश्रांची जादू!

मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी

अवघ्या २ आठवड्यात मोडले सर्व मोठे रेकॉर्ड; जगभरात होते 'या' सिरीजची चर्चा..

Netflix Series : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याच्या वेबसिरीजने सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. २०२६ ची सुरूवात

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.