मृतांच्या आकडेवारीवरुन ममता बॅनर्जी आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये मतभेद

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांची रेल्वेमत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट झाली. या दरम्यान माध्यमांशी बोलताना दोघांमध्ये मृतांच्या आकडेवारीवरून मतभेद झाले.


ममता बॅनर्जींनी या अपघातानंतर तीन डब्यांमध्ये अजूनही प्रवासी अडकलेले आहेत असा दावा केला. मात्र ही चुकीची माहिती असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. राज्य सरकारच्या डेटानुसार, सर्व डब्यांतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे व आतापर्यंत २३८ जण मृत झाले आहेत, असे रेल्वेमंत्री म्हणाले. मात्र ही तुम्ही कालची आकडेवारी सांगत आहात, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. हीच अधिकृत माहिती आहे असं रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा सांगितल्यावरदेखील ममता मला मिळालेल्या माहितीनुसार तीन डब्यांतील प्रवाशांपर्यंत अजून पोहोचता आलेले नाही या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या.

Comments
Add Comment

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने