मृतांच्या आकडेवारीवरुन ममता बॅनर्जी आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये मतभेद

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांची रेल्वेमत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट झाली. या दरम्यान माध्यमांशी बोलताना दोघांमध्ये मृतांच्या आकडेवारीवरून मतभेद झाले.


ममता बॅनर्जींनी या अपघातानंतर तीन डब्यांमध्ये अजूनही प्रवासी अडकलेले आहेत असा दावा केला. मात्र ही चुकीची माहिती असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. राज्य सरकारच्या डेटानुसार, सर्व डब्यांतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे व आतापर्यंत २३८ जण मृत झाले आहेत, असे रेल्वेमंत्री म्हणाले. मात्र ही तुम्ही कालची आकडेवारी सांगत आहात, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. हीच अधिकृत माहिती आहे असं रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा सांगितल्यावरदेखील ममता मला मिळालेल्या माहितीनुसार तीन डब्यांतील प्रवाशांपर्यंत अजून पोहोचता आलेले नाही या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या.

Comments
Add Comment

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेप नवी दिल्ली : जीएसटी कमी