मृतांच्या आकडेवारीवरुन ममता बॅनर्जी आणि रेल्वेमंत्र्यांमध्ये मतभेद

बालासोर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जण मरण पावले असून, ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांची रेल्वेमत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट झाली. या दरम्यान माध्यमांशी बोलताना दोघांमध्ये मृतांच्या आकडेवारीवरून मतभेद झाले.


ममता बॅनर्जींनी या अपघातानंतर तीन डब्यांमध्ये अजूनही प्रवासी अडकलेले आहेत असा दावा केला. मात्र ही चुकीची माहिती असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. राज्य सरकारच्या डेटानुसार, सर्व डब्यांतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे व आतापर्यंत २३८ जण मृत झाले आहेत, असे रेल्वेमंत्री म्हणाले. मात्र ही तुम्ही कालची आकडेवारी सांगत आहात, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. हीच अधिकृत माहिती आहे असं रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा सांगितल्यावरदेखील ममता मला मिळालेल्या माहितीनुसार तीन डब्यांतील प्रवाशांपर्यंत अजून पोहोचता आलेले नाही या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या.

Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय