वंदे भारत ट्रेनचे सिंधुदुर्ग भाजपकडून कणकवलीत होणार भव्य स्वागत

  187

माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती


संतोष राऊळ

कणकवली : वंदे भारत ट्रेनची स्वप्नपूर्ती झाली असून ३ जून रोजी वंदे भारत ट्रेन दुपारी साडे बारा वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनचे भव्य स्वागत केले जाणार आहे.


कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मडगाव येथे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी वंदे भारत ट्रेन कणकवली स्थानकात दाखल होणार आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे वंदे भारत ट्रेनला थांबा मिळाला आहे. त्याआधी वंदे भारत ट्रेन ला सिंधुदुर्गात थांबा नव्हता. सुपरफास्ट आणि पूर्ण वातानुकूलित असलेल्या या ट्रेन मधून अत्यंत आरामदायी आणि अगदी कमी वेळेत मुंबईहून कोकणात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात या ट्रेन ला थांबा मिळावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवाशातून होत होती.



केंद्रीयमंत्री राणे यांनी थेट केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत वंदे भारत ट्रेन ला कणकवलीत थांबा मिळवून घेतला. त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेला वंदे मातरम ट्रेन ने मुंबईला ये जा करणे सहजशक्य होणार आहे. त्यासाठीच कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच ३ जून रोजी धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने दुपारी साडे बारा वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर केले जाणार आहे. यासाठी सिंधुदुर्गवासीय तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची