कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर केल्याने कोल्हापूर महापालिकेची ही निवडणूक कमालीची चुरशीची ठरली. मंत्री, आमदार, खासदारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. पहिल्या टप्प्यातील निकाल हाती येऊ लागले असून अवघ्या तासाभरातच सत्तासमीकरणाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले.


तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला २० प्रभागांतील सर्व जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला परंतु बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपला २५ जागा तर शिवसेना शिंदे गटाला १५, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ असे मिळून महायुती एकूण ४४ जागा तर विनय कोरे यांचा असलेला पक्ष जनसुराज्यला एक जागा मिळाली आहे. सतेज पाटील यांनी एकाकी झूंज दिलेल्या काँग्रेसने ३५ जागांवर मजल मारली. तर ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. सत्ताधारी व विरोधकांमध्ये कडवी लढत पाहायला मिळाली. काही प्रभागांमध्ये अत्यल्प मताधिक्याने निकाल लागला, तर काही ठिकाणी एकतर्फी विजय नोंदवला गेला.


महिला उमेदवारांचा सहभाग आणि यश लक्षणीय ठरले असून अनेक प्रभागांमध्ये महिलांनी बाजी मारली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. मात्र काही ठिकाणी तणावाचे प्रसंगही घडल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. २० प्रभागातून एकूण ८१ सदस्य निवडून आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान चुरस, प्रचारातील आरोप-प्रत्यारोप आणि निकालाकडे लागलेली सर्वांची उत्सुकता अखेर संपली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण 

येत्या 26 जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र   मुंबई (विशेष प्रतिनिधी ) उच्‍च

Boat Accidents Maharashtra : गोंदियात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने २ तरुणांचा बुडून मृत्यू

गोंदिया : महाराष्ट्रात बीड, खेड आणि गोंदिया येथे पाण्यात बुडाल्याने सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) हळूहळू सक्रिय होत असून गुरुवारी (१२ जून) अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि

Chandrashekar Bawankule : गगनचुंबी टॉवर व झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर

 महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा; मुंबईत 'मायक्रो झोनिंग' सर्वेक्षण सुरू मुंबई : एकाच परिसरात गगनचुंबी टॉवर आणि

सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी

Agriculture Minister Dattatreya Bharne : वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

मुंबई : राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या