कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर केल्याने कोल्हापूर महापालिकेची ही निवडणूक कमालीची चुरशीची ठरली. मंत्री, आमदार, खासदारांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. पहिल्या टप्प्यातील निकाल हाती येऊ लागले असून अवघ्या तासाभरातच सत्तासमीकरणाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले.


तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला २० प्रभागांतील सर्व जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला परंतु बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपला २५ जागा तर शिवसेना शिंदे गटाला १५, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ असे मिळून महायुती एकूण ४४ जागा तर विनय कोरे यांचा असलेला पक्ष जनसुराज्यला एक जागा मिळाली आहे. सतेज पाटील यांनी एकाकी झूंज दिलेल्या काँग्रेसने ३५ जागांवर मजल मारली. तर ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. सत्ताधारी व विरोधकांमध्ये कडवी लढत पाहायला मिळाली. काही प्रभागांमध्ये अत्यल्प मताधिक्याने निकाल लागला, तर काही ठिकाणी एकतर्फी विजय नोंदवला गेला.


महिला उमेदवारांचा सहभाग आणि यश लक्षणीय ठरले असून अनेक प्रभागांमध्ये महिलांनी बाजी मारली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. मात्र काही ठिकाणी तणावाचे प्रसंगही घडल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. २० प्रभागातून एकूण ८१ सदस्य निवडून आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान चुरस, प्रचारातील आरोप-प्रत्यारोप आणि निकालाकडे लागलेली सर्वांची उत्सुकता अखेर संपली आहे.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व