राष्ट्रवादीची जागा शिरुरमधून कोण लढणार? अमोल कोल्हे की?

शिरुर : महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन वाद सुरु असतानाच आता पक्षांतर्गतदेखील उमेदवारीसाठी चढाओढ सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे असताना आताच्या निवडणुकीत खासदारकी अन्य उमेदवाराला जाणार का अशा चर्चा रंगत आहेत. याचे कारण म्हणजे विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्सवर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यातून विलास लांडे यांनी खासदारकी मिळण्यासाठी इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २०१९ च्या निवडणुकीत अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये ९ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून कोणकोणते उमेदवार कोणत्या जागा लढवतील, यासंबंधी चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच शिरुरमधील विलास लांडेंच्या बॅनरबाजीमुळे या जागेच्या उमेदवारीसाठी नवा नाद निर्माण होईल की काय, अशी चिन्हे दिसत आहेत.



उमेदवारीबाबत विलास लांडे आग्रही



राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असून २००९ पासूनच माझा या मतदारसंघात जनसंपर्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं विलास लांडे आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना अडसर ठरण्याची शक्यता आहे. २०१९ ला लांडे यांची पूर्ण तयारी झाली होती, तेव्हा ऐनवेळी राजकारणापलीकडे जाऊन सिनेकलाकार कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती.


मात्र आता पुन्हा एकदा विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने मतदारसंघात भावी खासदार अशी बॅनरबाजीदेखील केली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाची मतदारांची संख्या २३ लाखांची आहे. या भागात माझा मोठा जनसंपर्क आहे आणि म्हणूनच मी शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, असं ते म्हणाले.



शर्यत अजून संपली नाही...


दरम्यान, अमोल कोल्हे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. विलास लांडेंसोबत माझी सविस्तर चर्चा न झाल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. "२००९ साली लोकसभा निवडणूक लढवलेले विलास लांडेजी पुन्हा शिरुर लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. कोणालाही महत्त्वाकांक्षा असणं गैर नाही, त्यामुळे लांडेजींना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. पण असं म्हणतात की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही" असा टोला त्यांनी लगावला आहे.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार साहेब आणि मायबाप मतदारांच्या आशिर्वादामुळे एक सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना खासदार म्हणून निवडून आल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले. या प्रतिक्रियेदरम्यान त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच अजून कार्यकाळ संपलेला नाही त्यामुळे मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी यापुढील काळातही मी कार्यरत असेन, असं अमोल कोल्हे म्हणाले.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात