पैलवानांच्या शोषणाचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळतेय

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी व्यक्त केला विश्वास


नवी दिल्ली (प्रतिनिधी) : ‘महिला कुस्तीपटूंनी केलेल्या शोषणाच्या आरोपाचेप्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे’, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.महिला कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली असून तपास सुरु असल्याचे ते म्हणाले. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांच्यासह अनेक पदक विजेत्या खेळाडूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार बृजभषण सिंह यांना अटक करावी अशी मागणी करत दिल्लीत आंदोलन सुरू केली आहे.


केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर हे गुरूवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांना कुस्तीपटुंच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, केंद्र सरकार आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या मुद्द्यावर संवेदनशील आहे. खेळाडूंनी मागणी केल्यानुसार दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या मागणीनुसार, भारतीय कुस्ती महासंघाने एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.


कुस्तीपटूंनी असे कोणतेही पाऊल उचलू नये जे खेळ किंवा खेळाडुंना नुकसान पोहोचवेल, असे आवाहन आधी अनुराग ठाकुर यांनी केले होते. दरम्यान, जागतिक कुस्ती महासंघाने या आंदोलनाची दखल घेतली आहे. कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी केली जावी. त्याचबरोबर ४५ दिवसांत कुस्तीगीर महासंघाची नव्याने निवडणूक घ्यावी, नाहीतर भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त केला जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघाने दिला आहे.

Comments
Add Comment

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप नवी

अमेरिकेतली धक्कादायक घटना, पोलीस गोळीबारात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील ३२ वर्षांच्या मोहम्मद निजामुद्दीनचा अमेरिकेत स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक