५९ चिमुकल्यांची तस्करीतून सुटका, मदरशात नेण्याचा प्लॅन फसला

मनमाड: बिहारमधून महाराष्ट्रात तब्बल ५९ बालकांची तस्करी करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला. या बालकांची सुखरुप सुटका करुन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून पाच जणांवर कलम ४७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन होता.


बिहारहून महाराष्ट्रात दानापूर-पुणे एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या ३० लहान मुलांना मनमाड रेल्वे स्थानकामधून तर २९ लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकातून सोडवण्यात आलं. या मुलांची रवानगी जळगाव तसेच नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या मुलांना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यामधून सांगली येथे आणून मदरशामध्ये तस्करीसाठी आणण्याचा हा डाव होता. भुसावळ रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने हा डाव हाणून पाडला.


ही मुले ८ ते १५ वयोगटातील आहेत. सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat : भोंदू खरातच्या कार्यालयात मिळाल्या महिलांच्या नावाने चेक आणि अंगठीच्या रिंगा

सिन्नर मध्ये रूपाली चाकणकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक नाशिक :  भोंदू बाबा अशोक खरात याच्या कार्यालयाची

Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर

लातूर :  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना ७५

Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ