आपला मानसन्मान गंगेत विसर्जित करण्याचा पैलवानांचा निर्णय

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील नामांकित पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनाचा जोर वाढवला आहे. २३ एप्रिलपासून भडकलेल्या या आंदोलनावर महिन्याभरानंतरही तोडगा न निघाल्याने कुस्तीपटू नाराज झाले आहेत. याच नाराजीतून त्यांचा मानसन्मान असलेली पदकं हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. पैलवान विनेश फोगाट तसेच बजरंग पुनिया यांनी समाजमाध्यमांवरुन पोस्ट टाकत यासंबंधीची माहिती दिली.


पैलवानांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले, "आम्ही ही पदके गंगेत विसर्जित करणार आहोत, कारण ती 'गंगा मां' आहे. आपण गंगा मातेला जितके पवित्र मानतो, तितक्याच पवित्रतेने आपण कठोर परिश्रम करून ही पदके मिळवली आहेत. ही पदके संपूर्ण देशासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदकं ठेवण्याची योग्य जागा फक्त पवित्र माता गंगाच असू शकते."





युद्धात भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेट स्मारक उभारले आहे. आम्ही त्यांच्याइतके महान नाही परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांप्रमाणेच होती. गंगा नदीत पदके विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा पैलवानांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

सर्वोच्च न्यायालयात घडली धक्कादायक घटना, वकिलाने केला सरन्यायाधीशांवर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार