आपला मानसन्मान गंगेत विसर्जित करण्याचा पैलवानांचा निर्णय

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील नामांकित पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनाचा जोर वाढवला आहे. २३ एप्रिलपासून भडकलेल्या या आंदोलनावर महिन्याभरानंतरही तोडगा न निघाल्याने कुस्तीपटू नाराज झाले आहेत. याच नाराजीतून त्यांचा मानसन्मान असलेली पदकं हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. पैलवान विनेश फोगाट तसेच बजरंग पुनिया यांनी समाजमाध्यमांवरुन पोस्ट टाकत यासंबंधीची माहिती दिली.


पैलवानांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले, "आम्ही ही पदके गंगेत विसर्जित करणार आहोत, कारण ती 'गंगा मां' आहे. आपण गंगा मातेला जितके पवित्र मानतो, तितक्याच पवित्रतेने आपण कठोर परिश्रम करून ही पदके मिळवली आहेत. ही पदके संपूर्ण देशासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदकं ठेवण्याची योग्य जागा फक्त पवित्र माता गंगाच असू शकते."





युद्धात भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेट स्मारक उभारले आहे. आम्ही त्यांच्याइतके महान नाही परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांप्रमाणेच होती. गंगा नदीत पदके विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा पैलवानांनी दिला आहे.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३