आपला मानसन्मान गंगेत विसर्जित करण्याचा पैलवानांचा निर्णय

  182

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील नामांकित पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनाचा जोर वाढवला आहे. २३ एप्रिलपासून भडकलेल्या या आंदोलनावर महिन्याभरानंतरही तोडगा न निघाल्याने कुस्तीपटू नाराज झाले आहेत. याच नाराजीतून त्यांचा मानसन्मान असलेली पदकं हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. पैलवान विनेश फोगाट तसेच बजरंग पुनिया यांनी समाजमाध्यमांवरुन पोस्ट टाकत यासंबंधीची माहिती दिली.


पैलवानांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले, "आम्ही ही पदके गंगेत विसर्जित करणार आहोत, कारण ती 'गंगा मां' आहे. आपण गंगा मातेला जितके पवित्र मानतो, तितक्याच पवित्रतेने आपण कठोर परिश्रम करून ही पदके मिळवली आहेत. ही पदके संपूर्ण देशासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदकं ठेवण्याची योग्य जागा फक्त पवित्र माता गंगाच असू शकते."





युद्धात भारतीय सेनेच्या सैनिकांना जीव गमवावा लागला त्यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेट स्मारक उभारले आहे. आम्ही त्यांच्याइतके महान नाही परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांप्रमाणेच होती. गंगा नदीत पदके विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा पैलवानांनी दिला आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )