पाच विकेट्स राखत चेन्नईची पाचव्यांदा बाजी

अहमदाबाद : पावसामुळे अडकलेला चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स या दोन तगड्या संघांमधील आयपीएलचा अंतिम सामना काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला आणि अखेरीस चेन्नईने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. महाविजेतेपद पटकावत धोनीच्या संघाने आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाजी मारली आहे.


रविवारी पावसामुळे रद्द झालेला अंतिम सामना सोमवारी वेळेवर सुरू झाला. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये पावसाने गोंधळ घातल्याने जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार चेन्नईला विजयासाठी १५ षटकात १७१ धावांचे नवीन टार्गेट देण्यात आले होते.


शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने कमालीची खेळी केली आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. गुजरातकडून शेवटच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतरच्या तीन चेंडूंवर जडेजाने सलग एक-एक धाव काढली.


शेवटच्या चेंडूवर मात्र दमदार चौकार ठोकत चेन्नईनं अंतिम सामना जिंकला. एमएस धोनीसारख्या शैलीत खेळत त्याने शेवटच्या २ चेंडूत १० धावांची गरज असताना एक षटकार आणि एक चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग जेतेपदावर नेले.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला