भांडुपच्या जापनीस गार्डनची दुर्दशा

भांडुप : भांडुप पश्चिमेच्या गावदेवी मार्गावरील जापनीस उद्यानात गेले दोन महिने पाणी नाही. सर्व लाईट बंद आहेत. साफसफाई करण्यासाठी माळी नसल्यामुळे संपूर्ण उद्यानाची दैनावस्था झालेली आहे. या समस्यांबाबत नागरिकांकडून पालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र असे असूनही त्याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.



उद्यानातील झाडे-पाने सुकू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने स्प्रिंकलर बसविले. हे स्प्रिंकलर उद्यानाच्या उद्घाटन दिवशी बसविण्यात आले. त्यासाठी मुंबई महापालिकेने लाखो रुपये खर्च केले. यानंतर दोन- तीन महिने झाडांना पाणी मिळाले. सद्यस्थितीत हे स्प्रिंकलर बंद आहेत.



माजी आमदार व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी यांनी मुंबई महानगरपालिका एस विभागाच्या उद्यान विभागाला पत्रव्यवहार करूनही अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.



काही स्प्रिंकलर उद्यानातील जमिनीवर आलेले दिसत आहेत. त्यामुळे लहान मुले खेळताना पडतात. त्यांना दुखापत होते. महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. मात्र लगेचच त्याची दुरवस्था झाली. उद्यानात बसविण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केली जात नाही. एकीकडे अशुद्ध पाणी आढळल्यास महानगरपालिका दंड आकारत आहे व दुसरीकडे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.



त्याचप्रकारे उद्यानात सुरक्षारक्षक नाही. या परिस्थितीची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, अशी मागणी भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे व उद्यान विभागाचे मोहिते व वाजे यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे