चांद्रयान -३ च्या प्रक्षेपणाची तारीख ठरली

श्रीहरीकोटा : चांद्रयान कार्यक्रमाचा भाग असलेले व भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन असलेले तिसरे अंतराळ यान म्हणजेच चांद्रयान-३ श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. याच्या प्रक्षेपणासंबंधी नेमकी तारीख ठरवण्यात आलेली नव्हती. मात्र आता इस्रोने यासंबंधी अधिकृत घोषणा केली आहे. यानुसार १२ जुलैला 'चांद्रयान -३'चं प्रक्षेपण होणार आहे. हे चांद्रयान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता इस्रोने वर्तवली आहे.


२०१९ मध्ये चांद्रयान-२ चं प्रक्षेपण झालं होतं. परंतु हार्ड लॅंडिंग झाल्याने ते प्रत्यक्षात चंद्रावर उतरु शकले नाही. तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून एक प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले होते व चांद्रयान-३ ची घोषणाही त्याच वेळेस करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात चांद्रयान-२ मधील त्रुटी सुधारुन नवीन यान तयार करण्यात आलं.


चांद्रयान-३ हे चांद्रयान-२ चे फॉलो-ऑन मिशन आहे. यात लँडर आणि रोव्हर म्हणजे एका छोट्या गाडीचा समावेश आहे. यामध्ये ऑर्बिटर नाही, जे चांद्रयान-२ चं ऑर्बिटर होतं तेच याच्याशी संपर्क साधेल. या यानाला पृथ्वीपासून चंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी इंधनाची यंत्रणा जोडण्यात आली आहे, ही इंधनाची यंत्रणा यानाला १०० किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत घेऊन जाईल, अशी माहिती खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली.


विशेष बाब म्हणजे चांद्रयान-३ मध्ये नासाच्या एका प्रयोगाचादेखील समावेश करण्यात आला आहे. चंद्र आणि पृथ्वीमधील कमी-जास्त होणारं अंतर अगदी अचूकपणे मोजण्यासाठी यानावर काही आरसे लावले जातात. लेझरने त्याचा अभ्यास केला जातो. नासाच्या या उपकरणाचा चांद्रयान-३ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. चांद्रयान-१ ने चंद्रावर दक्षिण ध्रुवाकडे पाण्याचे साठे असल्याचे दाखवून दिले होते. त्याचा अभ्यास करणे हे चांद्रयान-३ चे मूळ उद्दिष्ट असेल.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या