ट्रकने कारला चिरडले; २ चिमुकल्यांसह सहा जण जागीच ठार

सोलापूर : कर्नाटकातील होस्पेट जवळील दोट्टीहाळ या गावाजवळ ट्रकने कारला दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात पती-पत्नी आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. याबाबतची माहिती सोमवारी सकाळी ग्रामस्थांकडून समजली.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील राघवेंद्र कांबळे हे १५ दिवसांपूर्वी लवंगी या आपल्या गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. ते बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत काम करायचे. रविवारी रात्री ते पत्नी, दोन मुलांसह कारमधून बंगळुरूला निघाले होते. वाटेत नंद्राळ इंडी येथील बहिणीच्या नातेवाइकांना घेऊन ते पुढे निघाले. हॉस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये ट्रकच्या खाली कार अडकली. अपघात इतका भीषण होता की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.


राघवेंद्र कांबळे हे वडील सुभाष व आई इंदुमती यांचे एकुलते पुत्र होते. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत.

Comments
Add Comment

पूरग्रस्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनकडून मदतीचा हात

सोलापूर : मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे त्रस्त झालेल्या सुमारे चार हजार

'महाभाग, गोंधळलेले लोक'; फडणवीसांनी विरोधकांना सोलून काढले!

शरद पवारांच्या अनुपस्थितीवरही ठेवले बोट; विरोधकांना सुनावले खडेबोल सोलापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ratnagiri News : धर्मस्थळाला काळिमा! रत्नागिरीतील आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अन्य पीडितांची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये (Khed, Ratnagiri) एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे,

Naxal Leader Bhupati : ६ कोटींचे बक्षीस असलेला 'मास्टरमाईंड' अखेर शरण! नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता भूपती नेमका कोण?

गडचिरोली : माओवाद विरोधी (Anti-Naxal) लढ्यात आज गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा विजय

Naxal Leader Bhupati : महाराष्ट्र नक्षलमुक्तीच्या उंबरठ्यावर! सोनू उर्फ भूपतीसह ६१ माओवाद्यांची मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती, मुख्यमंत्र्यांनी दिली संविधानाची प्रत

गडचिरोली : महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद संपण्याच्या दिशेने आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक पाऊल पडले आहे.

Cabinet Decision: मंत्रिमंडळाचे ३ मोठे निर्णय: २,२२८ नवी पदे, ५ लाख रोजगार, ५०० कोटींचा निधी!

हायकोर्टात बंपर भरती; महाराष्ट्र बांबू धोरण २०२५ जाहीर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेसाठी ५०० कोटींची