सोलापूर : कर्नाटकातील होस्पेट जवळील दोट्टीहाळ या गावाजवळ ट्रकने कारला दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात पती-पत्नी आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. याबाबतची माहिती सोमवारी सकाळी ग्रामस्थांकडून समजली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील राघवेंद्र कांबळे हे १५ दिवसांपूर्वी लवंगी या आपल्या गावी यल्लमा देवीच्या यात्रेसाठी आले होते. ते बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत काम करायचे. रविवारी रात्री ते पत्नी, दोन मुलांसह कारमधून बंगळुरूला निघाले होते. वाटेत नंद्राळ इंडी येथील बहिणीच्या नातेवाइकांना घेऊन ते पुढे निघाले. हॉस्पेटच्या पुढे गेल्यानंतर भरधाव ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये ट्रकच्या खाली कार अडकली. अपघात इतका भीषण होता की कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
राघवेंद्र कांबळे हे वडील सुभाष व आई इंदुमती यांचे एकुलते पुत्र होते. त्यांना तीन विवाहित बहिणी आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…