पुण्यातील आयटी पार्कमधील एका इमारतीला आग

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील मॅरिगोल्ड आयटी पार्कमधील वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांची कार्यालये असलेल्या एका टॉवरमध्ये आज सकाळी आग लागल्याने एकच धावपळ उडाली. पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ११:३० च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या आगीत ४ जण गंभीर जखमी झाले असून सुमारे १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत तर ४० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक पाण्याचे टँकर, ब्रँटो शिडी आणि इतर उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. पुणे अग्निशमन दलाने आयटी पार्कमधून ४० जणांची सुटका केली. या कारवाईदरम्यान अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.


अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी सुरक्षा कर्मचार्‍यांनी आयटी पार्क इमारतीत बसवलेल्या अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या मजल्यावर लागलेली आग चौथ्या मजल्यापर्यंत वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जागा रिकामी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यातील काही आतमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.


दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या सुमारे २० जणांवर डॉक्टरांच्या पथकाने उपचार केले. गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय काहींना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या काचेच्या भागाचा काही भाग तोडून अडकलेला धूर बाहेर काढला.

Comments
Add Comment

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; त्यांनी रामरक्षेची किमान दोन पाने तरी स्वतः वाचावीत मुंबई : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)