पुण्यातील आयटी पार्कमधील एका इमारतीला आग

  83

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील मॅरिगोल्ड आयटी पार्कमधील वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांची कार्यालये असलेल्या एका टॉवरमध्ये आज सकाळी आग लागल्याने एकच धावपळ उडाली. पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ११:३० च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या आगीत ४ जण गंभीर जखमी झाले असून सुमारे १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत तर ४० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक पाण्याचे टँकर, ब्रँटो शिडी आणि इतर उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. पुणे अग्निशमन दलाने आयटी पार्कमधून ४० जणांची सुटका केली. या कारवाईदरम्यान अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.


अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी सुरक्षा कर्मचार्‍यांनी आयटी पार्क इमारतीत बसवलेल्या अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या मजल्यावर लागलेली आग चौथ्या मजल्यापर्यंत वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जागा रिकामी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यातील काही आतमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.


दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या सुमारे २० जणांवर डॉक्टरांच्या पथकाने उपचार केले. गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय काहींना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या काचेच्या भागाचा काही भाग तोडून अडकलेला धूर बाहेर काढला.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या