पुण्यातील आयटी पार्कमधील एका इमारतीला आग

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील मॅरिगोल्ड आयटी पार्कमधील वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांची कार्यालये असलेल्या एका टॉवरमध्ये आज सकाळी आग लागल्याने एकच धावपळ उडाली. पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ११:३० च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या आगीत ४ जण गंभीर जखमी झाले असून सुमारे १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत तर ४० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक पाण्याचे टँकर, ब्रँटो शिडी आणि इतर उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले. पुणे अग्निशमन दलाने आयटी पार्कमधून ४० जणांची सुटका केली. या कारवाईदरम्यान अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.


अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी सुरक्षा कर्मचार्‍यांनी आयटी पार्क इमारतीत बसवलेल्या अग्निशामक यंत्रांचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या मजल्यावर लागलेली आग चौथ्या मजल्यापर्यंत वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जागा रिकामी करण्यास सुरुवात केली. मात्र त्यातील काही आतमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.


दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या सुमारे २० जणांवर डॉक्टरांच्या पथकाने उपचार केले. गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय काहींना श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या काचेच्या भागाचा काही भाग तोडून अडकलेला धूर बाहेर काढला.

Comments
Add Comment

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा पणन मंत्री जयकुमार रावल

वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था मुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून

Pandharpur News : पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या कारसह ४ किलो गांजा जप्त

पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती