विजेतेपदासाठी महासंग्राम

अहमदाबाद : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजेतेपद पटकावण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी महामुकाबला रंगणार आहे. गुरू धोनीविरुद्ध हार्दिकची पुन्हा अग्निपरीक्षा असेल. या अग्निपरीक्षेस पार केल्यास सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा करण्याचे गुजरातचे स्वप्न साकार होणार आहे. चेन्नईने हा सामना जिंकल्यास मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ५ ट्रॉफीज जिंकण्याच्या विक्रमाशी त्यांची बरोबरी होईल.


चेन्नईच्या विजेतेपद पटकावण्याच्या मार्गात गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलचा अडथळा आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात धोनीच्या टीमसमोर शुभमन गिलच्या बॅटला रोखण्याचे आव्हान असेल. यंदाच्या हंगामात तीन शतके आणि ८५१ धावा करणाऱ्या गिलच्या बॅटला लगाम घालणे हे सीएसकेसमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.


चेन्नईच्या ताफ्यातील दीपक चहर, रवींद्र जडेजा, मोईन अली, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना या गोलंदाजांसमोर गुजरातची परीक्षा असेल. चेन्नईसाठी डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे फॉर्मात आहेत. युवा फलंदाज शिवम दुबेने ३८६ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी हे अनुभवी फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. या सर्वांवर संघाच्या फलंदाजीची भिस्त असेल.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या