मुंबईतील सोसायट्या, घरमालकांना पालिकेचा दणका

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा भाग असलेल्या कीटकनाशक विभागाकडून पावसाळापूर्व तयारीसाठी उपाययोजना या जानेवारीपासून केल्या जातात. पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पावसाळापूर्व कामांमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे काम महापालिकेचा कीटकनाशक विभाग करत असतो. मात्र या उपाययोजना करण्यासाठी सोसायट्या, घरमालक सहकार्य करत नाहीत. त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने वारंवार आढळतात. महापालिकेने जानेवारी ते मे या कालावधीत अशा १२० सोसायटी, घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सोसायट्या आणि घरमालकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दंडही ठोठावला आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे डास उत्पत्तीस्थाने नष्ट करा किंवा त्यासाठी उपाययोजना करा अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराच महापालिकेने दिला आहे.


जानेवारी ते मे या कालावधीत मलेरिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मुंबईतील १८ हजार १९९ ठिकाणी यामध्ये खासगी इमारती, शासकीय इमारती इत्यादी ठिकाणी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये १ हजार ९२७ ठिकाणी डासांच्या उत्पत्तीस्थानांपैकी १ हजार ८६० ठिकाणी प्रत्यक्ष मलेरिया पसरवणारी डासांची उत्पत्ती स्थाने आढळली. तसेच १ लाख ३० हजार ८९० विविध कंटेनर तपासणी केल्यानंतर १ लाख २४ हजार ५२ कंटेनरमधील डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत. विविध यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची त्याआधी बैठकही होऊन त्यानुसार नियोजन केले जाते. या कामाला पावसाळ्याआधी किटकनाशक विभागाकडून गती देण्यात येत आहे. डासांची पैदास होऊ नये, यासाठी इमारतींवरील टाक्या डास प्रतिबंधक करणे, यासह अडगळीचे साहित्य निष्कासित करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात. यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून मोहीम चालवली जाते.डेंग्यूची उत्पत्तीस्थाने ही चाळ, झोपड्यांमध्ये आढळून येतात. गेल्या पाच महिन्यांत ६४ हजार ९४७ ठिकाणांमध्ये ४० लाख ३३ हजार १०८ घरांची तपासणी करण्यात आली.


कारवाईचा बडगा


जानेवारी ते मेपर्यंत उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३ हजार ७३८ सोसायटी, घरमालकांना नोटीस बजावून उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे आदेश दिले. यामध्ये बहुतांश नोटीस मलेरिया डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट न करण्याबाबतच आहेत. ३ हजार ७३८ पैकी १२० सोसायटी, घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मॅजिस्ट्रेट न्यायालयामार्फत दंड ठोठावण्यात आला आहे.


डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्याविरोधात दंड ठोठावण्यात येतो. हा दंड दोन हजार रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत असतो. आतापर्यंत ३ लाख ८२ हजार रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र