पुण्यात लवकरच लोकसभा पोटनिवडणूक, मात्र आघाडीत बिघाडी

  171

अजित पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ


पुणे: पुण्यात लोकसभेच्या पोटनिवडणुका लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. दिवंगत खासदार गिरिश बापट यांच्या रिक्त झालेल्या जागी ही पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मात्र या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता आहे.


अजित पवार म्हणाले की, पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझ्या आतल्या गोटातील माहिती आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्र पक्षालादेखील यावर बोलण्याचा अधिकार आहे


दरम्यान, पुणे लोकसभेसाठीच्या पोटनिवडणूकीची तयारी पुणे निवडणूक विभागाकडून पूर्ण झाल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीसाठी लागणारे मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. भाजपकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरु झाली असली तरी राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.


खरंतर मागील अनेक वर्षांपासून पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसलाच दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर या तीन नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची