कोण संजय राऊत? फडणवीसांच्या लेखी काडीचीही किंमत नाही

अहमदनगर : अहमदनगर दौ-यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर कोण संजय राऊत असा प्रतिप्रश्न करत त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलणे त्यांनी टाळले.
संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे नेते आहेत, अशी टीका करत फडणवीस यांच्या लेखी राऊतांना काडीचीही किंमत नसल्याचे दिसून आले.


महाविकास आघाडीमध्ये काही झाले तरी त्याचा आरोप भाजपवर होत असतो. भाजप सर्व काही करत असल्याचे बोलले जात असताना पुढील काळात मुलगा झाला तर आमचं नाव घेऊ नका, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.


लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. त्यात शिंदे गट २२ जागांवर दावा करेल, असे खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे. याबाबत विचारणा केली असता, आमच्याकडे कोणतीही अडचण नाही. आम्ही खूप समन्वय ठेऊन काम करतो. शिवसेना-भाजपा युतीत समन्वयाने काम होईल. आमच्या सर्व गोष्टी निश्चित होतील तेव्हा माध्यमांना याची माहिती देऊ, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत