बारावीच्या निकालात पोरगं शाळेत प्रथम पण घरावर काळाचा घाला

जळगावातील हृदयाला चटका लावणारी घटना


जळगाव: गुरुवारी-बारावीच्या निकालानंतर जळगावात हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे. १२ वीत शाळेतून पहिला क्रमांक पटकावलेल्या लेकावर वडिलांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


दुपारी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला होता. त्यात मृत आनंदा जगताप यांच्या मुलाने शाळेत पहिला क्रमांक पटकावला. मुलाचा आनंद साजरा करण्यासाठी आनंदा घरी जात होते. पण वाटेतच काळाने घात केला. मुलगा बारावी पास झाला यासाठी कुटुंबात उत्साह होता. परंतु घरातील कर्ता पुरुष अपघातात गेल्याची बातमी कळताच कुटुंबाला धक्का बसला. या बातमीने गावकरीही हळहळले. सध्या पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Satyajeet Tambe : सत्यजित तांबे अखेर भाजपच्या उंबरठ्यावर? मामा बाळासाहेब थोरातांनीच दिले 'ग्रीन सिग्नल'; म्हणाले, 'तो सज्ञान...

अहिल्यानगर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष

धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे

आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; जनता महायुतीसोबत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांना चपराक पंढरपूर :“आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मो o-.र्चे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप