बारावीच्या निकालात पोरगं शाळेत प्रथम पण घरावर काळाचा घाला

जळगावातील हृदयाला चटका लावणारी घटना


जळगाव: गुरुवारी-बारावीच्या निकालानंतर जळगावात हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे. १२ वीत शाळेतून पहिला क्रमांक पटकावलेल्या लेकावर वडिलांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


दुपारी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला होता. त्यात मृत आनंदा जगताप यांच्या मुलाने शाळेत पहिला क्रमांक पटकावला. मुलाचा आनंद साजरा करण्यासाठी आनंदा घरी जात होते. पण वाटेतच काळाने घात केला. मुलगा बारावी पास झाला यासाठी कुटुंबात उत्साह होता. परंतु घरातील कर्ता पुरुष अपघातात गेल्याची बातमी कळताच कुटुंबाला धक्का बसला. या बातमीने गावकरीही हळहळले. सध्या पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध