देशात भाजप राबविणार महिनाभर जनसंपर्क अभियान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : केंद्रातील मोदी सरकारला २६ मे रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपने महिनाभरापासून देशभर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीत देशभरात सुमारे ५० रॅली काढण्याची योजना आखली आहे. या सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अनेक भापचे बडे नेते सभांना संबोधित करणार आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० मे २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामुळे भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही चालना मिळणार आहे. ३१ मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ यांच्यासोबतच इतर केंद्रीय मंत्री आणि नेतेही या जनसंपर्क अभियानाचा भाग असणार आहेत. दरम्यान, २७ मे रोजी जे. पी. नड्डा पत्रकार परिषदेत मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामांबद्दल सांगणार आहेत. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने केंद्राच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्याची सुरुवात ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या रॅलीने होणार आहे. ३० मे ते ३० जून या कालावधीत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत पक्षातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

fertilizers stock : खरीप २०२६ हंगामासाठी देशात खतांचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांच्या शांतता करारानंतर निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या

Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी कोलकातातून जागतिक योग चळवळीचे करणार नेतृत्व

नवी दिल्ली : बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देणारा विशेष

Wind Energy : देशातील पहिल्या पवन ऊर्जा पुरवठा साखळी पोर्टलचा शुभारंभ

पणजी : भारताची नवीकरणीय ऊर्जा परिसंस्था बळकट करण्याच्या आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती

Cruise Missile : लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज, 15 जून 2026 रोजी ओदिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या

FSSAI ची मोठी कारवाई! खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये स्टेपल पिन, मेटल वायरला बंदी; नियम मोडल्यास दंडाची कारवाई

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI)

Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी