कराडपासून ऊस वाहतूकदारांच्या मोर्चाला सुरूवात

कराड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली काल २२ मे ला शेतकरी ऊस वाहतूकदारांचा मोर्चा कराडपासून सुरु झाला होता. आज मोर्चाचा दुसरा दिवस असून कराडजवळच्या बेलवडे हवेली येथे मुक्काम केल्यानंतर मोर्चा सातार्‍याच्या दिशेने निघाला आहे.


यावेळी सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, युवक यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत कारण सरकार हे मायबाप सरकार असतं. आम्ही ज्या मागण्या घेऊन निघालो आहोत, त्यासाठी सरकारला स्वतःच्या तिजोरीतून काही खर्च करावा लागत नाही. परंतु शेतकरीविरोधी जे कायदे आहेत ते थोडे मागे घ्या. जे राज्य सरकारच्या हातात आहेत ते राज्य सरकारने मागे घ्यावेत व केंद्र सरकारच्या हातात असलेल्या कायद्यांना मागे घेण्यासाठी प्रस्ताव पाठवून द्यावा, अशा आमच्या साध्या व सोप्या मागण्या आहेत."


शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांनी हा मोर्चा सुरु केला आहे. वाजतगाजत हा मोर्चा निघाला असून हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! 'या' कारणासाठी पुण्यातील भीमाशंकर मंदिर राहणार ३ महिने बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांमुळे मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद

निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या

धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच,

Ghodbunder Accident: घोडबंदर रोडवर मोठा अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या

ठाणे: ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी साखळी अपघाताची घटना घडली. गायमुख ट्रॅफिक चौकीसमोर, ठाणे ते मीरा रोड

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण