कराड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली काल २२ मे ला शेतकरी ऊस वाहतूकदारांचा मोर्चा कराडपासून सुरु झाला होता. आज मोर्चाचा दुसरा दिवस असून कराडजवळच्या बेलवडे हवेली येथे मुक्काम केल्यानंतर मोर्चा सातार्याच्या दिशेने निघाला आहे.
यावेळी सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, युवक यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत कारण सरकार हे मायबाप सरकार असतं. आम्ही ज्या मागण्या घेऊन निघालो आहोत, त्यासाठी सरकारला स्वतःच्या तिजोरीतून काही खर्च करावा लागत नाही. परंतु शेतकरीविरोधी जे कायदे आहेत ते थोडे मागे घ्या. जे राज्य सरकारच्या हातात आहेत ते राज्य सरकारने मागे घ्यावेत व केंद्र सरकारच्या हातात असलेल्या कायद्यांना मागे घेण्यासाठी प्रस्ताव पाठवून द्यावा, अशा आमच्या साध्या व सोप्या मागण्या आहेत.”
शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांनी हा मोर्चा सुरु केला आहे. वाजतगाजत हा मोर्चा निघाला असून हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…