कराडपासून ऊस वाहतूकदारांच्या मोर्चाला सुरूवात

कराड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली काल २२ मे ला शेतकरी ऊस वाहतूकदारांचा मोर्चा कराडपासून सुरु झाला होता. आज मोर्चाचा दुसरा दिवस असून कराडजवळच्या बेलवडे हवेली येथे मुक्काम केल्यानंतर मोर्चा सातार्‍याच्या दिशेने निघाला आहे.


यावेळी सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, युवक यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत कारण सरकार हे मायबाप सरकार असतं. आम्ही ज्या मागण्या घेऊन निघालो आहोत, त्यासाठी सरकारला स्वतःच्या तिजोरीतून काही खर्च करावा लागत नाही. परंतु शेतकरीविरोधी जे कायदे आहेत ते थोडे मागे घ्या. जे राज्य सरकारच्या हातात आहेत ते राज्य सरकारने मागे घ्यावेत व केंद्र सरकारच्या हातात असलेल्या कायद्यांना मागे घेण्यासाठी प्रस्ताव पाठवून द्यावा, अशा आमच्या साध्या व सोप्या मागण्या आहेत."


शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांनी हा मोर्चा सुरु केला आहे. वाजतगाजत हा मोर्चा निघाला असून हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.

Comments
Add Comment

लोणावळा स्टेशनवर RPF जवानांचे धाडस; प्रवासी थोडक्यात बचावला

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची धावपळ सुरू असते. चालू गाडी पकडण्याची घाई अनेकदा जीवघेणे प्रसंग

पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात दिसणाऱ्या बिबट्यांची

डॉ. गौरी पालवेच्या पार्थिवावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; अंत्यसंस्कारादरम्यान वडिलांचा आक्रोश, "तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या"

अहिल्यानगर : पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड