मुंबई पोलीस अलर्ट मोडवर! २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी

मुंबई: मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा फोन आला असून धमकी देणाऱ्याने त्यात २६/११ चा उल्लेख केला आहे. संबंधित व्यक्तीने फोन अचानक कट केला तसेच त्यात २६/११ चा उल्लेख केल्याने पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे फोन सुरू आहेत. त्यातच रविवारी रात्री एका अनोखळी क्रमांकावरून फोन आला. त्यात संबंधिताने मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा उल्लेख केला आणि अचानक फोन कट केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण राजस्थानमधून बोलत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या व्यक्तीने यापूर्वीही फोन केल्याचे समोर आले आहे.


मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकीही काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मिळाली होती. याबाबत एका संशयिताला पोलिसांनी चेंबूर परिसरातून अटक केली होती. इरफान अहमद शेख (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी असल्याचे सांगितले होते.


तसेच मुंबई पोलिसांना फेब्रुवारी महिन्यातही एक फोन आला होता. त्यात आता प्रमाणेच २६/११ चा उल्लेख करत मुंबईतल्या कुर्ला भागात स्फोट करू, असा इशारा देण्यात आला होता. पण तपासाअंती पोलिसांना याबाबत काहीही सापडलेले नव्हते.


या अशा धमक्यांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांसह मुंबई विमानतळ, मंत्रालय, बीएसई या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर

COVID-19 : साथीच्या आजारांसोबत कोविड आणि एन१एन१च्या रुग्णांतही झालीय वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरेसीस,