गुजरातची आरसीबीवर ६ विकेटसनी मात

बंगळुरू (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात रविवारी गुजरातने आरसीबीने दिलेले १९८ धावांचे आव्हान सहज पार केले. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या गुजरातच्या शुभमन गिल याने नाबाद १०४ धवांची झंझावाती खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. जिंकणे अशक्य वाटणारा हा सामना गुजरातने ६ विकेटस राखून जिंकला.विराट कोहलीचे शतक यावेळी व्यर्थ ठरले. कारण शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबीचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला आहे आणि मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे.



हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पावसामुळे सामना अर्धा तास उशीराने सुरु झाला. पावसामुळे मैदान संथ झालेले असल्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी येण्याची शक्यता वाटत होती. पांड्याचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरला. बंगळुरूच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि सलामी फलंदाज फाप डु प्लेसिस यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी ६७ धावांची सलामी दिली. नूर अहमद याने फाफला बाद करत ही जोडी फोडली. फाफ डु प्लेसिस याने १९चेंडूत २८ धावांची खेळी केली.


Comments
Add Comment

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने