गुजरातची आरसीबीवर ६ विकेटसनी मात

बंगळुरू (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात रविवारी गुजरातने आरसीबीने दिलेले १९८ धावांचे आव्हान सहज पार केले. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या गुजरातच्या शुभमन गिल याने नाबाद १०४ धवांची झंझावाती खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. जिंकणे अशक्य वाटणारा हा सामना गुजरातने ६ विकेटस राखून जिंकला.विराट कोहलीचे शतक यावेळी व्यर्थ ठरले. कारण शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबीचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला आहे आणि मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे.



हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पावसामुळे सामना अर्धा तास उशीराने सुरु झाला. पावसामुळे मैदान संथ झालेले असल्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी येण्याची शक्यता वाटत होती. पांड्याचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरला. बंगळुरूच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि सलामी फलंदाज फाप डु प्लेसिस यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी ६७ धावांची सलामी दिली. नूर अहमद याने फाफला बाद करत ही जोडी फोडली. फाफ डु प्लेसिस याने १९चेंडूत २८ धावांची खेळी केली.


Comments
Add Comment

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे