बंगळुरू (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात रविवारी गुजरातने आरसीबीने दिलेले १९८ धावांचे आव्हान सहज पार केले. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या गुजरातच्या शुभमन गिल याने नाबाद १०४ धवांची झंझावाती खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. जिंकणे अशक्य वाटणारा हा सामना गुजरातने ६ विकेटस राखून जिंकला.विराट कोहलीचे शतक यावेळी व्यर्थ ठरले. कारण शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबीचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला आहे आणि मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पावसामुळे सामना अर्धा तास उशीराने सुरु झाला. पावसामुळे मैदान संथ झालेले असल्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी येण्याची शक्यता वाटत होती. पांड्याचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरला. बंगळुरूच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि सलामी फलंदाज फाप डु प्लेसिस यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी ६७ धावांची सलामी दिली. नूर अहमद याने फाफला बाद करत ही जोडी फोडली. फाफ डु प्लेसिस याने १९चेंडूत २८ धावांची खेळी केली.
आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…
भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…
तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…
आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…