दशक्रिया विधीसाठी गंगा घाटावर आले आणि...

बलिया : गंगेसारख्या पवित्र ठिकाणी अनेक धार्मिक विधी केले जातात. सोमवारी सकाळीदेखील दशक्रिया विधीसाठी लोक गंगा नदीच्या माल्देपूर घाटाजवळ आले होते. मात्र विधी उरकून परतताना अनपेक्षितपणे मोठी दुर्घटना घडली. या प्रवाशांना घेऊन जाणारी नाव अचानक पाण्यात उलटल्याने अपघात झाला.



उत्तर प्रदेशच्या बलिया येथे पेफना पोलीस ठाणे परीक्षेत्रातील माल्देपूर घाटाजवळ ही दुर्घटना घडली. एका बोटमधून ४० जण प्रवास करत होते. त्यामध्ये, ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्दैवाने अद्याप किती जण बेपत्ता झाले आणि बुडाले आहेत याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. त्या लोकांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.



नाव उलटल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. काहींना स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढले, तर ज्यांना पोहायला येत होते, तेही स्वत;हून बाहेर आल्याने बचावले. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या