दशक्रिया विधीसाठी गंगा घाटावर आले आणि...

बलिया : गंगेसारख्या पवित्र ठिकाणी अनेक धार्मिक विधी केले जातात. सोमवारी सकाळीदेखील दशक्रिया विधीसाठी लोक गंगा नदीच्या माल्देपूर घाटाजवळ आले होते. मात्र विधी उरकून परतताना अनपेक्षितपणे मोठी दुर्घटना घडली. या प्रवाशांना घेऊन जाणारी नाव अचानक पाण्यात उलटल्याने अपघात झाला.



उत्तर प्रदेशच्या बलिया येथे पेफना पोलीस ठाणे परीक्षेत्रातील माल्देपूर घाटाजवळ ही दुर्घटना घडली. एका बोटमधून ४० जण प्रवास करत होते. त्यामध्ये, ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्दैवाने अद्याप किती जण बेपत्ता झाले आणि बुडाले आहेत याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. त्या लोकांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.



नाव उलटल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. काहींना स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढले, तर ज्यांना पोहायला येत होते, तेही स्वत;हून बाहेर आल्याने बचावले. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित

भारत ब्रह्मपुत्रा नदीवर तयार करणार जलसाठा प्रकल्प

चीनच्या ७७ अब्ज डॉलर्सच्या हायड्रो प्रकल्पाला देणार प्रत्युत्तर नवी दिल्ली : ब्रह्मपुत्र नदीवर चीनने सुरू

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा

हे भाजपा सरकार आहे, जे बोलतो ते करतो - अमित शाह

जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा